शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

प्रवाशांच्या जीवाशी मांडला खेळ

By admin | Updated: April 21, 2016 02:10 IST

मुरबे ग्रामपंचायतीने या वर्षी आपल्याला प्रवासी वाहतुकीचा ठेका १ एप्रिलपासून मिळणार हे माहित असूनही आवश्यकत्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने मुरबे, सातपाटी खाडीतून जीवघेणा

हितेन नाईक,  पालघरपालघर : मुरबे ग्रामपंचायतीने या वर्षी आपल्याला प्रवासी वाहतुकीचा ठेका १ एप्रिलपासून मिळणार हे माहित असूनही आवश्यकत्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने मुरबे, सातपाटी खाडीतून जीवघेणा प्रवास करण्याची पाळी प्रवाशांवर ओढावली आहे. अलिकडच्या काळात वऱ्हाड नेणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू व अनेक जखमी होण्याची दुर्घटना घडली तरी प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी ही वाहतूक सुरू आहे. गेल्याच आठवड्यात अशी होडी उलटून एकाचा मृत्यू होऊन सहा मरता मरता वाचले होते. तरी प्रशासन ढिम्म आहे.याबाबत वृत्त असे की, सातपाटी आणि मुरबे या दरम्यान खाडी आहे. ती ओलांडण्यासाठी बोट हे एकमेव साधन आहे. खाडीतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला मेरीटाइम बोर्डाची मान्यता घेणे, तिची प्रवास क्षमता, तांडेल, तिच्यावरील जीवरक्षक सुविधा याची तपासणी करून मग ती प्रवासाला सिद्ध करणे, याबाबी पार पाडल्या जात नाहीत. त्या ऐवजी एका वर्षी मुरबे आणि एका वर्षी सातपाटी येथील व्यावसायिकांना या बोटीने वाहतूक करण्याचा ठेका दिला जातो. २० प्रवासी क्षमतेची बोट दोन्ही व्यावसायिक वापरतात. प्रसंगी त्यातच ३० ते ४० प्रवासी भरले जातात. या वेळी १ एप्रिलपासून मुरबे येथील व्यावसायिकाला हा वाहतूक ठेका मिळणार होता. त्याने आपल्या बोटीबाबत आवश्यकत्या परवानग्या घेऊन त्याची कागदपत्रे सादर न केल्याने शेवटी छोट्या छोट्या होड्यांमधून जीवघेणी वाहतूक सध्या सुरू आहे. मुळात या होड्या प्रवासी वाहतूकीसाठी नसतात. त्यांची वहनक्षमता कमी असते तरीही पर्यायर नसल्यामुळे शेवटी ग्रामस्थ त्यांचा वापर करतात. सगळ््याना घाई असते मग जीवावरचा धोका पत्करून जास्तीतजास्त प्रवासी कोंबले जातात. त्यातूनच दुर्घटना होते. हे माहित असूनही प्रवाशांची जीवाशी खेळणारी ही वाहतूक सध्या सुरू आहे. त्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मेरीटाइम बोर्डा सह इतर कायदेशीर परवानग्या न घेताच सालाबाद प्रमाणे या वर्षीही मुरबे-सातपाटी खाडीतील प्रवासी होडीचा ठेका सुरु करण्याचा मुरबे ग्रामपंचयतीचा हलगार्जी पणामुळे १६ दिवसा पासून प्रवासी होडी बंद पडली होती. त्या मुळे नाइलाजने एका छोट्या होडीतून प्रवास करताना गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात सातपाटी मधील दीपक मेर हया घरातील एकुलत्या एक कमावत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होवून ६ लोक मृत्यूशी झुंज देवून वाचले होते.सातपाटी-मुरबे खाडीतून प्रवास करणार्या प्रवाशांची वाहतूक करण्या साठी १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान चा एक-एक वर्षाचा ठेका सातपाटी आणि मुरबे ग्रामपंचायतिला पंचायत समिति मार्फत दिला जातो. या प्रवासी वाहतुकीचा ठेका घेतांना महाराष्ट्र मेरीटाईम,बन्दर विभागा सह तत्सम विभागाच्या रितसर परवानग्या घेणे बंधनकारक असताना आता पर्यन्त अशा रितसर परवानग्या न घेताच बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक केली जात होती. तसेच बोटीत क्षमते पेक्षा जास्त प्रवासी भरले जात असल्याने अपघाता ची शक्यता गृहीत धरून होडीत लाईम जॅकेट ठेवण्या संदर्भात प्रशासनाने आदेश द्यावेत या साठी लोकमत मागील आठ वर्षा पासून सतत वृत प्रसिद्ध करीत आहे. परंतु प्रशासनाला अद्यापही याचे गांर्भीय वाटत नसल्यामुळे एका कुटुंबातील कर्त्या पुरुषावर आपला जीव गमाविण्याची पाळी ओढवली आहे. विशेष म्हणजे ही बेकायदेशीर वाहतूक बंदर विभाग आणि कस्टम विभाग यांच्या कार्यालयासमोरुनच होत असते हे विशेष. तहसीलदार, गटविकास अधिकारी इ.नी चांगल्या, प्रशस्त बोटीची व्यवस्था करून द्यावी तिच्यात लाईफ जॅकटची सोय आहे की नाही याची तपासणी करावी. ती वरचेवर करण्याचे आदेश ग्रामसेवक आणि सरपंचाना द्यावेत अशी जनतेची मागणी आहे. सातपाटी-मुरबे ही दोन्ही मच्छीमारी गावे असल्याने मासेमारी व्यवसाय, मासे विक्र ी च्या दृष्टीने अथवा सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहरांच्या दृष्टीने मुरब्यातील अनेक मच्छीमाराना खाडीतून येजा करावी लागते. तसेच मुरबे येथील टेक्नीकल कॉलेज, तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यात काम करण्या साठी दररोज हजारो लोक,कामगार हया खाडीतून चालनाऱ्या बोटीतून प्रवास करतात. सातपाटी येथून पालघर,बोईसर असा प्रवास करून तारापूर च्या औद्योगिक परिसरातील कारखान्यात पोहचण्या साठी ५० ते ६० रु पये खर्च येतो.परंतु खाडीतून प्रवासी बोटीद्वारे १५ ते २० रूपयात सहज पोचता येते.यात वेळेचीही बचत मोठ्या प्रमाणात होतअसल्याने कामगार व विद्यार्थी खाडी तील प्रवासाला पसंती देतात.