शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:29 IST

दोनऐवजी तीन प्रवासी बसवून जास्त भाडे लाटतात

डोंबिवली : कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता आरटीओने रिक्षात केवळ दोन प्रवासी घेण्याचा नियम केला असताना काही रिक्षाचालक तीन प्रवासी बसवून दुप्पट भाडे आकारत आहेत. रिक्षा बंद राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्याकरिता काही रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे डोंबिवलीकर नाराज व भयभीत झाले आहेत.

डोंबिवलीत दूरच्या अंतराकरिता शेअर पद्धतीने रिक्षा चालवण्यात येत होत्या. मात्र, कोरोना महामारीनंतर जेव्हा रिक्षांची वाहतूक सुरू झाली, तेव्हा केवळ दोघांना बसण्याची परवानगी आरटीओने दिली. मात्र, काही रिक्षाचालक तीन किंवा चार प्रवासी बसवत आहेत. मानपाडा येथून पलावा येथे जाण्यासाठी अगोदर २० रुपये घेतले जात होते. केवळ दोन प्रवासी बसवायचे, या नियमामुळे रिक्षाचालकांनी भाडे दुप्पट वाढवून ४० रुपये केले. नंतर ते नियमही धाब्यावर बसवून तीन प्रवासी बसवले जात आहेत. त्यामुळे भाडे दुप्पट व प्रवासीही तीन बसवायचे, अशी हडेलहप्पी काही रिक्षाचालकांनी सुरू केली आहे.

प्रवाशांची लूट करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. मुंबई प्रवासाकरिता जून, जुलै महिन्यांत अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच परवानगी होती. परंतु, आॅगस्टपासून खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली. त्यासाठी एसटीचा प्रवास खर्चिक नसला, तरी प्रवासी संख्या वाढल्याने दोन जणांना एका सीटवर बसवतात. त्यामुळे संसर्गाची भीती वाढली आहे.

सकाळी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. पूर्वेला इंदिरा गांधी चौकात बसची वाट पाहत उभे राहावे लागते. बस अन्यत्र कुठे थांबत नाही. त्यामुळे ठाकुर्ली, चोळेगाव आदी ठिकाणच्या प्रवाशांना इंदिरा गांधी चौकातच यावे लागते. च्खासगी वाहनाने अंबरनाथ, बदलापूर येथे येण्याजाण्यासाठी दिवसाला ३०० रुपये खर्च येत असल्याचे प्रवासी म्हणाले. रेल्वे वाहतूक बंद असतानाच कॉलेज सुरू झाले, तर हजारो विद्यार्थी प्रवासाकरिता गर्दी करतील. च्अशावेळी हा प्रवास अधिक त्रासदायक होणार असल्याचे अनेकांनी सांगितले. रेल्वे तातडीने सुरू करा आणि आमची या यातनादायक प्रवासातून सुटका करा, अशी मागणी येथील प्रवाशांनी केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस