शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

खेळाचं मातीशी नातं तुटत चाललंय !

By admin | Updated: December 28, 2015 02:02 IST

इंटरनेटच्या जमान्यात आता खेळाचं मातीशी नातं तुटतं चाललंय. कबड्डी आणि खो-खो सुद्धा मातीत खेळलं जात नाही. बुट आले आणि माती गेली

वसई : इंटरनेटच्या जमान्यात आता खेळाचं मातीशी नातं तुटतं चाललंय. कबड्डी आणि खो-खो सुद्धा मातीत खेळलं जात नाही. बुट आले आणि माती गेली. मातीचा स्पर्शसुद्धा होऊ दिला जात नाही. कारण मॅट सारख्या बाबींचा वापर होतो. , अशी खंत सिने दिग्दर्शक-कलावंत मकरंद देशपांडे यांनी वसईत २६ व्या कला-क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली.५० हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेल्या २६ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे काल वसईच्या चिमाजी आप्पा मैदानावर शानदार उद्घाटन झाले. क्रिकेटपटू धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून तर अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे आणि अमोल गुप्ते यांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले. अभिनेता आयुुष टंडन, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस, आयुक्त सतीश लोखंडे, महोत्सव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ आणि कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे यावेळी उपस्थित होते.मुंबईत आता क्रीडांगणे नावापुरतीच उरली आहेत. क्रीडेचा मातीशी संपर्क तुटला असून आता माती नसलेल्या मैदानात बुट घालून खेळ खेळले जातात, अशी खंत व्यत करताना देशपांडे यांनी कलेत चुकलं तर चालतं. पण क्रीडेत चुकीला माफी नसते. याठिकाणी कला-क्रीडेचा सुंदर समन्वय साधला गेला आहे,असे गौरवोद्गार काढले. महोत्सव एक सुंदर इव्हेंट असून त्यातून कला-क्रीडा जोपासण्याचे काम केले जात आहे. इथून प्रत्येक जण काही ना काही शिकून जातो, असे गौरवोद्गार अमोल गुप्ते यांनी काढले. धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, आयुष टंडन यांनी आपल्या छोटेखानी भाषणात महोत्सवाचे कौतुक केले.पाहुण्यांच्या हस्ते वसईत तालुक्याातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजय चौधरी, अमन चौधरी. तेरेजा डिसोझा, हार्दीक पाटील शुभम वनमाळी, हर्षद म्हात्रे, रवींद्र माने, मुग्धा लेले, प्रा. माणिक दोतोंडे, रमाकांत वाघचौडे आदींचा गौरव करण्यात आला. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात पाक कला, बॉक्सिंग, पुष्परचना, वेशभूषा, सॅलेड डेकोरेशन, शरीरसौष्ठव, प्रश्न मंजूषा, मेंदी, भजन, मूकाभिनय, पारंपारिक वेशभूषा, वादविवाद यांच्यासह ३४ काल आणि ३४ क्रीडा मिळून एकूण ६८ प्रकारात स्पर्धा होणार आहेत. (प्रतिनिधी)