शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

भिवंडीत पसरले घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:12 IST

कचराकुंड्या ओव्हरफ्लो : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाविरोधात संताप

भिवंडी : शहरातील कचराकुंडीतील कचरा नियमित उचलला जात नसल्याने ऐन पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणी कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. तसेच कचरा उचलल्यानंतर जंतुनाशके न फवारल्याने शहरात परलेल्या दुर्गंधीने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

शहरात घंटागाडी, डम्पर, जेसीबी आणि कंत्राटदारांच्या कामगारांकडून कचरा उचलला जात आहे. महापालिकेचे एकूण पाच प्रभाग आहेत. त्यापैकी प्रत्येक प्रभागासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली असून त्यांना नियमित व सुटीच्या दिवशीही कचरा उचलण्यासाठी सांगितले आहे. तरीही ऐन सणाच्या दिवशी व सरकारी सुटीच्या दिवशी घंटागाडी घरोघरी येत नसल्याने नागरिकांच्या घरांत कचरा साचून राहतो. तर कचराकुंडीतील कचरा जेसीबी व डम्परने न उचलल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंडीत किंवा लोकवस्तीतील कुंडीत कचरा नेहमी साचलेला दिसतो.आरोग्य विभागात जेसीबी आणि डम्परच्या नोंदीपेक्षा कमी वाहने शहरात कचरा उचलत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या सर्व वाहनांचा नियमित कामाचा तपशील आरोग्य विभागाने ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरात जैन र्र्ध्मियांचे उपवास सुरू असल्याने काही मंदिराजवळील दुर्गंधी दूर करण्यासाठी जंतूनाशके फवारणी करण्याची मागणी केली असता तेथे पालिकेच्या आरोग्य विभागाने जंतूनाशके न फवारता धुराची फवारणी केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दरवर्षी खरेदी केलेले जंतुनाशक औषधे कुठे जातात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात जंतूनाशक औषधे फवारणी न करता पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून कंत्राटदारांना पाठिशी घालणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.कचरा उचलण्याचे दिले आदेशशहरातील कचºयाचे नियोजन बकरी ईदमुळे ढासळले असून त्यामुळे नागरी वसाहतीतील कचराकुंडीत कचरा साचला आहे. हा कचरा उचलण्यासाठी कंत्राटदारांना आदेश दिले आहेत. लवकरच हा कचरा उचलला जाईल,अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी यांनी देऊन जंतुनाशक औषधांचा तपशील देण्याचे टाळले.

टॅग्स :bhiwandiभिवंडीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न