शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ठाणे आयुक्तालयांत निनावी फोन करणाऱ्यास भिवंडीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:34 IST

भिवंडी : शहरात गणेशोत्सावाची धामधुम सुरू असताना ‘ भिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे’,असा मोबाईलवरून निनावी फोन करून पोलीसांची धावपळ उडविणा-या एका इसमाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी चार तासांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून शहरात अधिक प्रमाणांत पोलीस बंदोवस्त वाढविण्यात आला आला आहे. बासुदेव गौतम राय(४०) ...

ठळक मुद्देभिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे असा मोबाईलवरून निनावी फोनठाणे आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात निनावी फोनचार तासांत पोलीसांनी केले आरोपीस अटक

भिवंडी: शहरात गणेशोत्सावाची धामधुम सुरू असताना ‘भिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे’,असा मोबाईलवरून निनावी फोन करून पोलीसांची धावपळ उडविणा-या एका इसमाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी चार तासांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून शहरात अधिक प्रमाणांत पोलीस बंदोवस्त वाढविण्यात आला आला आहे. बासुदेव गौतम राय(४०) असे निनावी फोन करणा-याचे नांव असुन तो मुळ कलकत्ता येथील रहाणारा आहे. पद्मानगर येथील गायत्रीनगरमध्ये सध्या त्याचे वास्तव्य असुन तो यंत्रमाग कामगार आहे. काल गुरूवारी दुपारी शहरातील सर्व पोलीस गणेशोत्सावाच्या बंदोवस्तात असताना त्याने दारूच्या नशेत ठाणे आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षात निनावी फोन करून पोलीसांची झोप उडवून टाकली. ठाणे गुन्हे शाखा पोलीसांनी आपल्या तपास यंत्रणेव्दारे सदर मोबाईलच्या घटनास्थळाचा शोध घेतला असता तो भिवंडीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार भिवंडीतील शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्याने तो मोबाईल धारक शहरातील पद्मानगर येथील गायत्रीनगर येथील असल्याचे आढळून आले. त्याचा शोध घेत पोलीसांनी चार तासांत आरोपी बासुदेव राय यास दारूच्या नशेत अटक केली. मात्र सणांचे दिवस असल्याने या बाबत पोलीसांनी अत्यंत गुप्तता पाळली. शहर पोलीस ठाण्यात बासुदेव राय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन त्यास पोलीसांनी जेल मध्ये ठेवले आहे.निनावी फोन करणा-या व्यक्तीस पोलीसांनी अटक केली तरी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून शहरात गणेशोत्सावाच्या निमीत्ताने शहरात सुरक्षीततेच्या उपाय योजना राबविण्यास काल गुरूवार पासुन सुरू केल्या आहेत. आज शुक्रवारी रोजी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन कंपन्या तसेच राज्य सुरक्षा बलच्या चार कंपन्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवता पोलीसांशी संपर्क ठेवावा.तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे,असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी