शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ठाणे आयुक्तालयांत निनावी फोन करणाऱ्यास भिवंडीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:34 IST

भिवंडी : शहरात गणेशोत्सावाची धामधुम सुरू असताना ‘ भिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे’,असा मोबाईलवरून निनावी फोन करून पोलीसांची धावपळ उडविणा-या एका इसमाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी चार तासांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून शहरात अधिक प्रमाणांत पोलीस बंदोवस्त वाढविण्यात आला आला आहे. बासुदेव गौतम राय(४०) ...

ठळक मुद्देभिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे असा मोबाईलवरून निनावी फोनठाणे आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात निनावी फोनचार तासांत पोलीसांनी केले आरोपीस अटक

भिवंडी: शहरात गणेशोत्सावाची धामधुम सुरू असताना ‘भिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे’,असा मोबाईलवरून निनावी फोन करून पोलीसांची धावपळ उडविणा-या एका इसमाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी चार तासांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून शहरात अधिक प्रमाणांत पोलीस बंदोवस्त वाढविण्यात आला आला आहे. बासुदेव गौतम राय(४०) असे निनावी फोन करणा-याचे नांव असुन तो मुळ कलकत्ता येथील रहाणारा आहे. पद्मानगर येथील गायत्रीनगरमध्ये सध्या त्याचे वास्तव्य असुन तो यंत्रमाग कामगार आहे. काल गुरूवारी दुपारी शहरातील सर्व पोलीस गणेशोत्सावाच्या बंदोवस्तात असताना त्याने दारूच्या नशेत ठाणे आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षात निनावी फोन करून पोलीसांची झोप उडवून टाकली. ठाणे गुन्हे शाखा पोलीसांनी आपल्या तपास यंत्रणेव्दारे सदर मोबाईलच्या घटनास्थळाचा शोध घेतला असता तो भिवंडीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार भिवंडीतील शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्याने तो मोबाईल धारक शहरातील पद्मानगर येथील गायत्रीनगर येथील असल्याचे आढळून आले. त्याचा शोध घेत पोलीसांनी चार तासांत आरोपी बासुदेव राय यास दारूच्या नशेत अटक केली. मात्र सणांचे दिवस असल्याने या बाबत पोलीसांनी अत्यंत गुप्तता पाळली. शहर पोलीस ठाण्यात बासुदेव राय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन त्यास पोलीसांनी जेल मध्ये ठेवले आहे.निनावी फोन करणा-या व्यक्तीस पोलीसांनी अटक केली तरी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून शहरात गणेशोत्सावाच्या निमीत्ताने शहरात सुरक्षीततेच्या उपाय योजना राबविण्यास काल गुरूवार पासुन सुरू केल्या आहेत. आज शुक्रवारी रोजी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन कंपन्या तसेच राज्य सुरक्षा बलच्या चार कंपन्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवता पोलीसांशी संपर्क ठेवावा.तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे,असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी