शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

फ्युनिक्युलर रेल्वेला आणखी १० महिने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:51 IST

मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या पिलरपैकी त्यापैकी तीन अवघड, तर अन्य तीन तुलनेने उभारण्यास सोपे असल्याची माहिती रुळांचे काम करणारे तज्ज्ञ सल्लागार, सह ठेकेदार वसंत जोशी यांनी दिली.रूळांच्या पिलरच्या कामाला आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असून ते मे महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे जोशी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रुळांची उभारणी, डबे, त्यांची रितसर चाचणी, तपासण्या कराव्या लागतील. पावसाळ््यात धुके, पावसाच्या सरींमुळे तेथे काम करणे फारसे शक्य होत नाही. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अन्य तांत्रिक कामे होतील. तसेच वरच्या भागातील स्टेशनची बांधणी होईल. ही कामे पूर्ण होण्यास दिवाळी उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिलपासून या प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली. पण तेव्हाही ठेकेदाराने दिलेली मुदत टळली. त्यामुळे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला असता ही माहिती समोर आली. गेल्यावर्षीच्या भेटीवेळी जोशी यांच्यासह शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गटविकास अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.२००८ पासून सुप्रीम कंपनीने सुरु केलेले काम आर्थिक मुद्द्यांमुळे बंद पडले होते. ते सुरू होत नसल्याने कंपनीला काळ््या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल खासदार शिंदेंनी केली होता. त्याची नोंद घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीला तंबी देत संधी दिली. पण अजून काम पूर्ण झालेले नाही. मध्यंतरी पालकमंत्री शिंदेंच्या दालनात बैठका झाल्या आणि पुन्हा कामास सुरुवात झाली. मात्र काम पूर्ण होण्यास साधारणत: डिसेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रकल्पाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम सुरू आहे. प्रकल्प ८० कोटींचा असून त्यातील सुमारे १० कोटींचा निधी मिळणे शिल्लक होते. आताही नऊ कोटींचे काम बाकी आहे. गेल्या दहा महिन्यात अवघ्या एक कोटींच्या खर्चाचे काम झाले आहे. त्यामुळे मे महिन्यापूर्वी रूळांसह महत्वाचे काम झाले, तरच पावसाळ््यानंतर स्टशन तांत्रिक कामे पूर्ण करून रेल्वेच्या चाचण्या सुरू करता येतील आणि वर्षअखेरीस ही रेल्वे धावेल, असा अंदाज आहे.सुप्रीम कंपनीने हे काम हाती घेतले. पण निधी वेळेवर न मिळाल्याने ते वेळोवेळी रखडले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यास केवळ कंपनी जबाबदार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात त्यासंदर्भात वेळोवेळी बैठका झाल्या. त्यात त्यांना काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव आला होता. पण त्यांना एक संधी देण्यात आली असून आता काम सुरु झाले आहे. ते मे महिन्यात पूर्ण होऊन पावसाळ््यानंतर पर्यटकांसह मलंग भक्तांना रेल्वेची सुविधा मिळेल.- श्रीकांत शिंदे, खासदार

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण