शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

फ्युनिक्युलर रेल्वेला आणखी १० महिने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:51 IST

मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या पिलरपैकी त्यापैकी तीन अवघड, तर अन्य तीन तुलनेने उभारण्यास सोपे असल्याची माहिती रुळांचे काम करणारे तज्ज्ञ सल्लागार, सह ठेकेदार वसंत जोशी यांनी दिली.रूळांच्या पिलरच्या कामाला आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असून ते मे महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे जोशी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रुळांची उभारणी, डबे, त्यांची रितसर चाचणी, तपासण्या कराव्या लागतील. पावसाळ््यात धुके, पावसाच्या सरींमुळे तेथे काम करणे फारसे शक्य होत नाही. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अन्य तांत्रिक कामे होतील. तसेच वरच्या भागातील स्टेशनची बांधणी होईल. ही कामे पूर्ण होण्यास दिवाळी उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिलपासून या प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली. पण तेव्हाही ठेकेदाराने दिलेली मुदत टळली. त्यामुळे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला असता ही माहिती समोर आली. गेल्यावर्षीच्या भेटीवेळी जोशी यांच्यासह शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गटविकास अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.२००८ पासून सुप्रीम कंपनीने सुरु केलेले काम आर्थिक मुद्द्यांमुळे बंद पडले होते. ते सुरू होत नसल्याने कंपनीला काळ््या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल खासदार शिंदेंनी केली होता. त्याची नोंद घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीला तंबी देत संधी दिली. पण अजून काम पूर्ण झालेले नाही. मध्यंतरी पालकमंत्री शिंदेंच्या दालनात बैठका झाल्या आणि पुन्हा कामास सुरुवात झाली. मात्र काम पूर्ण होण्यास साधारणत: डिसेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रकल्पाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम सुरू आहे. प्रकल्प ८० कोटींचा असून त्यातील सुमारे १० कोटींचा निधी मिळणे शिल्लक होते. आताही नऊ कोटींचे काम बाकी आहे. गेल्या दहा महिन्यात अवघ्या एक कोटींच्या खर्चाचे काम झाले आहे. त्यामुळे मे महिन्यापूर्वी रूळांसह महत्वाचे काम झाले, तरच पावसाळ््यानंतर स्टशन तांत्रिक कामे पूर्ण करून रेल्वेच्या चाचण्या सुरू करता येतील आणि वर्षअखेरीस ही रेल्वे धावेल, असा अंदाज आहे.सुप्रीम कंपनीने हे काम हाती घेतले. पण निधी वेळेवर न मिळाल्याने ते वेळोवेळी रखडले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यास केवळ कंपनी जबाबदार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात त्यासंदर्भात वेळोवेळी बैठका झाल्या. त्यात त्यांना काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव आला होता. पण त्यांना एक संधी देण्यात आली असून आता काम सुरु झाले आहे. ते मे महिन्यात पूर्ण होऊन पावसाळ््यानंतर पर्यटकांसह मलंग भक्तांना रेल्वेची सुविधा मिळेल.- श्रीकांत शिंदे, खासदार

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण