शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

उघड्यावरच होतात अंत्यसंस्कार; रायते, वावेघरच्या ग्रामस्थांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:54 IST

जागेअभावी निधी गेला परत

टिटवाळा : स्मशानभूमी बांधण्यासाठी आलेला निधी जागेअभावी चार वेळा परत गेल्यामुळे कल्याण तालुक्यातील रायते, वावेघर आणि नवगाव येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहेत. पावसाळ्यात तर ग्रामस्थांची अवस्था बिकट होत आहे. तिन्ही गावांसाठी स्मशानभूमी बांधण्याचा लाखोंचा निधी आला होता. मात्र, ग्रामस्थांमधील मतभेदांमुळे त्यासाठी जागाच उपलब्ध न झाल्यामुळे तो चारवेळा परत पाठवण्याची नामुश्की ओढवली.रायते या गावातील पोलीस पाटील स्वप्नील पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उल्हास नदीच्या तीरावर रायते पुलाच्या बाजूला उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले. कल्याण-मुरबाड महामार्गाच्या शेजारी आणि उल्हास नदीच्या काठावर रायते हे गाव आहे. तर कल्याण-कसारा रेल्वे मार्गालगत खंडवली ग्रामपंचायत हद्दीतील वावेघर हे गाव आहे. नवगाव हे बापसाई ग्रामपंचायत हद्दीत येते. स्मशानभूमीसाठी जागाच मिळत नाही. सरकारी भूखंडावर स्मशानभूमी बांधायला घेतली तर ग्रामस्थच हरकती घेतात. आता कायदेशीर मार्गाने शासनाकडे जागा मागितली आहे.हे काम शेवटच्या टप्प्यात असून दोन-तीन महिन्यांपासून फाइल पंचायत समितीत अडकली असल्याचे रायतेचे सरपंच पद्मश्री जाधव यांनी सांगितले.कल्याण तालुक्यातील रायते, वावेघर आणि नवगाव या तिन्ही गावांतील स्मशानभूमीसाठी शासनाकडून प्रत्येकी २० लाख रु पये निधी मंजूर करून दिला. मात्र, ग्रामस्थ जागा उपलब्ध करून देत नसल्याने हा निधी चार वेळा परत गेला आहे.- किसन कथोरे, आमदार