शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

भिवंडीतील २४ गावांच्या पाणीयोजनेत स्टेम कंपनीला अर्थसाह्य करा, केंद्रीय मंत्र्यांचे साकडे

By नितीन पंडित | Updated: July 4, 2023 16:53 IST

भिवंडी तालुक्यातील २४ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मे १९८७ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती

भिवंडी - जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील २४ गावांमध्ये सुरू असलेल्या पाणी योजनेचा समावेश करून स्टेम कंपनीला योजनेच्या नुतनीकरणासाठी अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

भिवंडी तालुक्यातील २४ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मे १९८७ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. कालांतराने ती स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे वर्ग करण्यात आली. या योजनेला आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला असून, वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा कमी होत आहे. त्याचबरोबर माणकोली ते खारबाव, काटई, कांबे, शेलार, बोरपाडा, सुरई, भरोडी, काल्हेर परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जुनी झाली आहे. या जलवाहिनीच्या कामाचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ४९.५० किलोमीटर जलवाहिनी टाकण्यासाठी ६३ कोटी ८७ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामानंतर २४ गावांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. तसेच प्रति माणसी प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा शक्य होईल, असे स्टेम कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे म्हणणे असल्याने मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील २४ गावांमध्ये अंतर्गत जलवाहिनीची कामे सुरू आहेत. मात्र, मुख्य वाहिनीच्या कामासाठी जल जीवन जीवन मिशनच्या माध्यमातून निधीची आवश्यकता आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.