शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

भिवंडीतील २४ गावांच्या पाणीयोजनेत स्टेम कंपनीला अर्थसाह्य करा, केंद्रीय मंत्र्यांचे साकडे

By नितीन पंडित | Updated: July 4, 2023 16:53 IST

भिवंडी तालुक्यातील २४ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मे १९८७ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती

भिवंडी - जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील २४ गावांमध्ये सुरू असलेल्या पाणी योजनेचा समावेश करून स्टेम कंपनीला योजनेच्या नुतनीकरणासाठी अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

भिवंडी तालुक्यातील २४ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मे १९८७ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. कालांतराने ती स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे वर्ग करण्यात आली. या योजनेला आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला असून, वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा कमी होत आहे. त्याचबरोबर माणकोली ते खारबाव, काटई, कांबे, शेलार, बोरपाडा, सुरई, भरोडी, काल्हेर परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जुनी झाली आहे. या जलवाहिनीच्या कामाचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ४९.५० किलोमीटर जलवाहिनी टाकण्यासाठी ६३ कोटी ८७ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामानंतर २४ गावांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. तसेच प्रति माणसी प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा शक्य होईल, असे स्टेम कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे म्हणणे असल्याने मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील २४ गावांमध्ये अंतर्गत जलवाहिनीची कामे सुरू आहेत. मात्र, मुख्य वाहिनीच्या कामासाठी जल जीवन जीवन मिशनच्या माध्यमातून निधीची आवश्यकता आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.