शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

आघाडीला चिंता अस्तित्वाची

By admin | Updated: October 14, 2015 02:43 IST

केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अघोषित काडीमोड घेतला असल्याने स्वतंत्ररित्या मंगळवारी अर्ज भरले. आधी नको नको म्हणणाऱ्या भाजपासह आघाडीने संघर्ष समितीच्या माध्यमातून

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अघोषित काडीमोड घेतला असल्याने स्वतंत्ररित्या मंगळवारी अर्ज भरले. आधी नको नको म्हणणाऱ्या भाजपासह आघाडीने संघर्ष समितीच्या माध्यमातून तर सेनेने स्वतंत्ररित्या २७ गावांंमधून फॉर्म भरल्याने अखेर ही निवडणूक सर्वच्या सर्व १२२ जागांसाठी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने सेना-भाजपातच बिग फाइट होणार असल्याचे चित्र आहे.युती संदर्भातील सर्व चर्चा फोल ठरल्याने शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले, तर भाजपानेही कल्याणमध्ये तसेच काहींच्या घरी जाऊन त्याचे वाटप केले. त्यामुळे कल्याणसह डोंबिवलीतील फॉर्म स्वीकारण्याच्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण भागातील २७ गावांमधून येणाऱ्या अर्जदारांसाठी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्ससह अन्य सुरक्षायंत्रणेचा फौजफाटा तैनात करण्यात केला होता. सर्वच ठिकाणच्या अर्ज स्वीकारण्याच्या केंद्रांवर सेना-भाजपाचे उमेदवार आले की, त्यांचे समर्थक मोठ्याने घोषणा देत होते, त्यामुळे काही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणेवरचा ताण वाढला होता. अखेरीस दुपारी अत्यंत शांततेच्या वातावरणात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पार पडली. युती नाही असे समजूनच दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस अधिक तणावाचे असतील. विशेषत: जेथे सेना-भाजपाचे उमेदवारांचे तुल्यबळ समसमान आहे तेथे विशेष वॉच ठेवावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने खासगी फौज उभी करण्यासाठी व्यायाम शाळेच्या युवकांना तर सेनेच्या वतीने नाशिकमधील काहींना येथे बोलावले आहे. त्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.आघाडीमध्येही सध्या तरी उत्साहाचे वातावरण असून सेना-भाजपाच्या भांडणाचा लाभ कसा उठवता येइल, याकडे मनसेचे लक्ष आहे. त्यातच २७ गावांमधील संघर्ष समिती यापुढे नेमके काय पाऊल उचलते हे महत्त्वाचे आहे. काँग्रेसला कान्होजी जेधे मैदान, गावदेवी, इंदितानगर, आयरेरोड, दत्तनगर या भागातून अपेक्षा आहेत. शिवसेनेचे पश्चिमेला मोठागाव-ठाकुर्ली, आनंदनहर, महाराष्ट्रनगर, कोपर रोड, सखाराम कॉम्प्लेक्स यासह पूर्वेला संगितावाडी, दत्तनगर, सारस्वत कॉलनी, आदी भागात अपेक्षा आहेत. अशाच पद्धतीने कल्याण पूर्वेत आणि पश्चिमेतही प्रत्येक पक्षांचे पॉकेट असून तेथून संबंधितांचे उमेदवार निवडून येतील असा दावा करण्यात येत आहे.कल्याण ग्रामीणमध्ये नेमके कोण बाजी मारते त्यावरच पक्षाचा महापौर कोण असू शकतो हे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेने तेथून सर्व जागांवर फॉर्म भरल्याने अन्य पक्षांनीही फॉर्म भरले. आघाडीने मात्र संघर्ष समितीवर निर्णय सोपवल्याने त्या पक्षाकडून तेथून अर्ज भरले की नाही हे स्पष्ट नाही.