शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आघाडीला चिंता अस्तित्वाची

By admin | Updated: October 14, 2015 02:43 IST

केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अघोषित काडीमोड घेतला असल्याने स्वतंत्ररित्या मंगळवारी अर्ज भरले. आधी नको नको म्हणणाऱ्या भाजपासह आघाडीने संघर्ष समितीच्या माध्यमातून

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अघोषित काडीमोड घेतला असल्याने स्वतंत्ररित्या मंगळवारी अर्ज भरले. आधी नको नको म्हणणाऱ्या भाजपासह आघाडीने संघर्ष समितीच्या माध्यमातून तर सेनेने स्वतंत्ररित्या २७ गावांंमधून फॉर्म भरल्याने अखेर ही निवडणूक सर्वच्या सर्व १२२ जागांसाठी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने सेना-भाजपातच बिग फाइट होणार असल्याचे चित्र आहे.युती संदर्भातील सर्व चर्चा फोल ठरल्याने शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले, तर भाजपानेही कल्याणमध्ये तसेच काहींच्या घरी जाऊन त्याचे वाटप केले. त्यामुळे कल्याणसह डोंबिवलीतील फॉर्म स्वीकारण्याच्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण भागातील २७ गावांमधून येणाऱ्या अर्जदारांसाठी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्ससह अन्य सुरक्षायंत्रणेचा फौजफाटा तैनात करण्यात केला होता. सर्वच ठिकाणच्या अर्ज स्वीकारण्याच्या केंद्रांवर सेना-भाजपाचे उमेदवार आले की, त्यांचे समर्थक मोठ्याने घोषणा देत होते, त्यामुळे काही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणेवरचा ताण वाढला होता. अखेरीस दुपारी अत्यंत शांततेच्या वातावरणात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पार पडली. युती नाही असे समजूनच दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस अधिक तणावाचे असतील. विशेषत: जेथे सेना-भाजपाचे उमेदवारांचे तुल्यबळ समसमान आहे तेथे विशेष वॉच ठेवावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने खासगी फौज उभी करण्यासाठी व्यायाम शाळेच्या युवकांना तर सेनेच्या वतीने नाशिकमधील काहींना येथे बोलावले आहे. त्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.आघाडीमध्येही सध्या तरी उत्साहाचे वातावरण असून सेना-भाजपाच्या भांडणाचा लाभ कसा उठवता येइल, याकडे मनसेचे लक्ष आहे. त्यातच २७ गावांमधील संघर्ष समिती यापुढे नेमके काय पाऊल उचलते हे महत्त्वाचे आहे. काँग्रेसला कान्होजी जेधे मैदान, गावदेवी, इंदितानगर, आयरेरोड, दत्तनगर या भागातून अपेक्षा आहेत. शिवसेनेचे पश्चिमेला मोठागाव-ठाकुर्ली, आनंदनहर, महाराष्ट्रनगर, कोपर रोड, सखाराम कॉम्प्लेक्स यासह पूर्वेला संगितावाडी, दत्तनगर, सारस्वत कॉलनी, आदी भागात अपेक्षा आहेत. अशाच पद्धतीने कल्याण पूर्वेत आणि पश्चिमेतही प्रत्येक पक्षांचे पॉकेट असून तेथून संबंधितांचे उमेदवार निवडून येतील असा दावा करण्यात येत आहे.कल्याण ग्रामीणमध्ये नेमके कोण बाजी मारते त्यावरच पक्षाचा महापौर कोण असू शकतो हे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेने तेथून सर्व जागांवर फॉर्म भरल्याने अन्य पक्षांनीही फॉर्म भरले. आघाडीने मात्र संघर्ष समितीवर निर्णय सोपवल्याने त्या पक्षाकडून तेथून अर्ज भरले की नाही हे स्पष्ट नाही.