शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

ठाणे तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:22 IST

सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

ठाणे : सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. खर्चाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न होत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. या समस्येतून शेतकºयांना बाहेर काढून आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च व मजुरी रोजगार हमीतून द्यावी, आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शेतमजुरांनी येथील तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.जांभळीनाक्यावरील शिवाजी मैदानावर एकत्र आलेल्या या मोर्चेकºयांनी मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेला. यावेळी महिला कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून आला. प्रवेशद्वारावर अडवण्यात आलेल्या या मोर्चेकºयांमुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली. शेतीतून येणारे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. या आर्थिक ताळेबंदातून मुक्त होण्यासाठी शेतकरी पारंपरिक शेतीपासून परावृत्त होत आहे. यास वेळीच पायबंद घालण्यासाठी श्रमजीवी कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढून शासनास धारेवर धरले.शेतकºयांच्या खर्चाचे आर्थिक चित्र बदलवण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमधील सर्व तहसील कार्यालयांवर श्रमजीवींनी एकाच दिवशी मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले. याप्रमाणे येथील तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सरकारकडे मागणी करून रोजगार हमी योजनेत बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत, संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकाºयांसोबत नागपूर येथे अधिवेशनकाळात बैठकही पार पडली. तरीदेखील विलंब होत असल्यामुळे श्रमजीवींनी मोर्चे काढून सरकारने तातडीने शेतीची कामे रोजगार हमीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली. यामुळे शेतकरी सक्षम होऊ शकेल, आदिवासी-दुर्गम भागात शेती करणे परवडेल आणि भुकेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल, असे मोर्चेकºयांच्या मार्गदर्शन प्रसंगी पंडित यांनी स्पष्ट केले.