शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

पाणीयोजनेचे काम निकृष्ट झाल्याने पंचायत समितीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:38 IST

थेट अधिवेशनात जाणार; मुरबाडमधील कळंभे ग्रामस्थांचा इशारा

मुरबाड : पन्नास लाख रुपयांच्या खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुमार दर्जाचे झाल्याने कळंभे ग्रामस्थांनी गुरुवारी मुरबाड पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या मोर्चात गावातील महिला तसेच पुरुष सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांना १५ दिवसांत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावर सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास कळंभे गावकºयांनी थेट अधिवेशनात धडकणार, असा इशारा दिला.कायम पाणीटंचाईची झळ सोसणाºया कळंबे गावासाठी आ. किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये ५१ लाख रुपये खर्चाची योजना मिळाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या योजनेतील ठेकेदार आणि अधिकारी यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा गावकºयांचा आरोप आहे. तसेच याच योजनेतून पाणीसाठवण करण्यासाठी बनवण्यात आलेली पाण्याची टाकी ही गळकी असल्याने तसेच पाइप निकृष्ट बसवल्याने काम सुमार दर्जाचे झाल्याचे समोर आले. याचाच जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता. विशेष म्हणजे पंचायत समितीत भाजपची सत्ता असताना पंचायत समिती उपसभापती सीमा घरत, अनिल घरत तसेच सदस्य दीपक पवार, सदस्या सीमा चौधरी आणि सचिन चौधरी यांनी गावकºयांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले. गटविकास अधिकारी केळसकर यांच्या दालनात या सर्वांसोबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी कारवाईसंबंधी पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी येझरे यांनी मोर्चेकºयांना आश्वासन दिले. येत्या १५ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावू. तसे न झाल्यास संबंधित ठेकेदारावर पोलीस कारवाई करण्याची हमी दिली.

टॅग्स :Waterपाणी