शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चोरीचे मोबाइल सांभाळण्याची डोकेदुखी; जुने २०० मोबाइल घ्यायला ‘स्मार्ट’मालक फिरकेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:06 IST

- पंकज रोडेकरठाणे : मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा बसवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातूनच, पोलीस तपासात स्मार्ट फोनपूर्वीचे हस्तगत केलेले जुने मोबाइल सांभाळणे आता एक नवी जबाबदारी पोलिसांच्या अंगावर येऊन पडली आहे. कारण, ते ...

- पंकज रोडेकरठाणे : मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा बसवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातूनच, पोलीस तपासात स्मार्ट फोनपूर्वीचे हस्तगत केलेले जुने मोबाइल सांभाळणे आता एक नवी जबाबदारी पोलिसांच्या अंगावर येऊन पडली आहे. कारण, ते घेण्यासाठी तक्रारदार येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच हा इलेक्ट्रॉनिक कचरा नष्ट करण्यासाठी कोणतेही आदेश नसल्याने ती डोकेदुखीच ठाण्यासह इतरही रेल्वे पोलिसांना होऊन बसल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दररोज चार ते पाच मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. जून २०१७ पासून लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाइलचोरीबाबत ‘एफआयआर’ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच, मागील वर्षभरात ३००२ मोबाइलचोरीची नोंद झाली आहे. इतर गुन्ह्यांपेक्षा मोबाइलचोरीच्या या वाढत्या घटना लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी पेट्रोलिंगवर भर दिला. साध्या वेशातील पोलीस फलाटांवर तैनात केले. एवढेच नाहीतर रेकॉर्डवरील मोबाइलचोरट्यांची ‘टॉप २५’ ही यादी अद्ययावतही केली आहे. त्यामुळे या चोरीच्या घटना मध्यंतरी कमी झाल्या होत्या. पण, पुन्हा त्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात चोरट्यांना पकडल्यावर त्यांच्याकडून मोबाइल हस्तगतही केले जात आहेत. पण, हस्तगत होणाऱ्या मोबाइलमध्ये (अ‍ॅण्ड्राइड) स्मार्ट फोन असेल, तर तक्रारदार येऊन मोबाइल घेऊन जातात. पण, अ‍ॅण्ड्राइडपूर्वीचे मोबाइल घेण्यासाठी कोणी येत नाही. त्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जवळपास २०० जुने मोबाइल आहेत. तसेच ते नष्ट करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. यामुळे ते नष्टही करता येत नाही. त्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हे जुने मोबाइल सुरक्षेसह एका बॉक्समध्ये ठेवल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.10% गुन्ह्यांचे प्रमाण बाहेरचेरेल्वेच्या हद्दीबाहेर चोरीला जाणाºया मोबाइल फोनची तक्रार ही ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी नागरिक येतात. हे प्रमाण साधारणत: १० टक्के आहे. त्यातूनच रेल्वेत मोबाइलचोरीचे प्रमाण वाढत आहे. तसेच लोकल प्रवासातून उतरताना मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्या स्थानकाच्या हद्दीत तक्रार दाखल करण्यासाठी नागरिक येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Mobileमोबाइल