शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

आता वारंवार वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर होणार जबर दंडाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 20:33 IST

तब्बल १४० कलमांच्या कारवाईला ठाण्यात सुरुवात

ठाणे: ठाणे यापुढे मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. त्यामुळे ११ डिसेंबर (मध्यरात्री) पासून नविन दंड आकारणी सुरु केल्याची माहिती ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी दिली. त्यामुळे आता अनधिकृत वाहन चालकाला पूर्वीच्या दोनशे रुपयांऐवजी थेट पाच हजार रुपये तर वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्याला दोनशे रुपयांऐवजी एक हजार ते दहा हजारांचा दंड मोजावा लागणार आहे. त्यामुळेच वाहतूकीचे नियम न मोडण्याचे आवाहनही उपायुक्त पाटील यांनी केले आहे.

नविन मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. सुधारित अधिनियमानुसार ई-चलन प्रणालीमध्ये ११ डिसेंबर २०२१ रोजीच्या मध्यरात्रीपासून ही नवीन दंड आकारणी सुरु झाली आहे. यामध्ये विविध १९४ कलमांचा समावेश आहे. त्यापैकी ५४ कलमे ही तडजोड न करता येणारी असून १४० कलमे ही तडजोड योग्य आहेत. तडजोड योग्य सर्व कलमान्वये कारवाई सुरु केली असून एकापेक्षा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंडाची रक्कम ही मशिनद्वारे आपोआप आकरली जाणार असल्याचेही उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

या नविन नियमानुसार पोलिसांचा आदेश नाकारल्यास पूर्वीच्या दोनशे रुपयांऐवजी सुरुवातीला पाचशे त्यानंतर दीड हजारांचा दंड घेतला जाणार आहे. विना लायसन्स आणि परवाना संपूनही वाहन चालविल्यास पाचशे ऐवजी थेट पाच हजारांचा दंड आकारणी होईल. तर वाहनांची शर्यत लावणा:यांना सुरुवातीला पाच हजार तर दुस:यांदा दहा हजार रुपयांचा फटका बसणार आहे. वाहनाचा वीमा नसल्यास दोनशे ऐवजी आधी दोन हजार नंतर चार हजार आकारणी होईल. 

वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवरही आता एक हजारांऐवजी दुचाकी आणि तीन चाकी एक हजार, ट्रॅक्टर- दीड हजार आणि लहान वाहने चार हजारांचा दंड होणार आहे. याशिवाय, विना हेल्मेट दुचाकीस्वारांनाही पाचशे ऐवजी सुरुवातीला पाचशे दुसऱ्यांदा दीड हजार दंड बसणार आहे. याशिवाय, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्यांनाही आता दोनशे ऐवजी दुचाकीधारकाला सुरुवातीला एक हजार, तीन चाकी दोन हजार, जड वाहन चार हजार तर दुस:यांदा पकडल्यास दहा हजारांचा दंड भरण्याची नामूष्की ओढवणार आहे.

''वाहतूकीचे नियम मोडल्यामुळे अपघातांची संख्या वाढून जिवितहानी होते. रस्त्यावरील प्रत्येक चूक ही प्राणघातक ठरू लागली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी स्वत:सह आपल्या कुटूंबियांचा तसच इतर वाहन धारकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी घ्यावी. अन्यथा वाढलेल्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे.''

-बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस