शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

दहशतवादापासून मुक्तीची सुरूवात प्रभू श्रीरामांनी केली - देवेंद्र फडणवीस

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 20, 2024 15:17 IST

गावदेवी मैदाने येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सुशसान, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुम्बकम् याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य. मोदींनी दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त बार, परिवावारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भरभारत, एक भारत, श्रेष्ठ भारत या सगळ्या रामराज्याच्या संकल्पना मांडल्या आहेत. दहशतवादापासून मुक्तीची सुरूवात प्रभू श्रीरामांनी केली. सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या राक्षसांचा निपात श्रीरामाने केला. त्याचप्रमाणे भारतातील दुर्जन शक्ती, आहेत, खिळखिळ करणाऱ्या शक्ती, दहशतवाद माजवणाऱ्या शक्तींचा निपात होणारच हे मोदी यांनी दाखवून दिले. आज आवश्यकता पडली तर सर्जिकलस्ट्राईक, एअर स्ट्राईक होतो. ३७० कलम हटवून दुर्जन शक्तीला सांगितले जाते भारताचे तुकडे तुम्हाला करुन देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले. 

गावदेवी मैदाने येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, राममंदिराच्या ठिकाणी मस्जीद कधीच नव्हते. मीर बाकीने देखील कधी तेथे नमाज अदा केली नाही. बाबरीचा मस्जीदचा तयार केलेला ढाचा तो कलंकाचा ढाचा होता आणि तो गुलामीचा ढाचा ६ डिसेंबर १९९२ ला तोडून त्याठिकाणी पुन्हा एकदा राम मंदिराची स्थापना केली. त्यावेळी नारा होता ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे’, आता नवीन नारा आहे ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे आता भव्य मंदिर होत आहे. २२ जानेवारीचा दिवस कारसेवकांकरीता आनंदाचा दिवस आहे. यानिमित्ताने नविनभारताची निर्मिती मोदी करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणो गुलामगिरीची अंतिम निशाणी आपण संपवत आहोत आणि त्या ठिकाणी रामलल्ला येत आहे. गेल्या ९ वर्षांत वेगवेगळ्या योजनेंच्या माध्यमातून २५ कोटींच्यावर लोक गरिबीरेषेच्यावर आलेत. हा जगाच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. ज्यांच्या मनात, कामात राम त्यांच्या हातून हे घडते, असे फडणवीस म्हणाले.

रामराज्याची संकल्पना मांडत मोदींनी हे कार्य केले. राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीवरुन एक रुपया पाठवतो तेव्हा शेवटच्या माणसाला २५ पैसे मिळतात आणि उर्वरित ८५ पैसे व्यवस्था खाऊन टाकते पण मोदींनी सांगितले, मी एक रुपया पाठवेल आणि तो शेवटच्यापर्यंत एक रुपयाच पोहोचेल अशी भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था मोदींनी तयार केली. श्रीरामांच्या चरित्रात परिवारवाद पाहायला मिळत नाही. त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये परिवारापेक्षा समाज श्रेष्ठ होता. राजकीय व्यक्तीच्या परिवारातल्या लोकांनी त्यांचे नात्यात आहे यापेक्षा आपल्या कर्तुत्वावर राजकारणात आले पाहिजे. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरणा घेऊन मोदींनी सामान्य माणसाला अधिकार देत त्यांना लोकशाहीमध्ये सहभागी करून घेण्याचे काम त्यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस