शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

कळवा खाडीच्या तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:41 IST

ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणा-या तिस-या पुलाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणा-या तिस-या पुलाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. परंतु हा खाडीपूल एका बाजूने साकेतच्या दिशेने खाली उतरणार असल्याने त्या ठिकाणी कांदळवनाचे क्षेत्र बाधित होणार होते. त्यामुळे ते पालिकेकडे वळते करण्यासंदर्भात ठाणे महापालिकेकडे राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने येथील ०.२७४ हेक्टर कांदळवनक्षेत्र हे वळते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या खाडीपुलाच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.मुंबईच्या सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील विटावा पुलाखालील आणि एकूणच या भागातील वाहतूककोंडी सुटावी यासाठी कळवा खाडी पुलावर तिसºया नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये पुढे आणला होता. सध्या येथील कळवा खाडीवर एक ब्रिटिशकालीन आणि आणि एक नवा पूल आहे; परंतु ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दुसºया पुलावर वाहतुकीचा वेग मंदावला असून तोही वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसºया पुलाचा पर्याय पुढे आणला. आता कांदळवनाचा प्रश्न सुटल्याने हे कामही मार्गी लागणार आहे.>असा आहे तिसरा पूलमहापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता त्यावर १८३ कोटींचा खर्च केला जात आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर तो उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वनवे पूल असणार आहे. तर विटाव्याकडून येणाºया वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय ठेवला आहे.या तिसºया पुलामुळे येथील वाहतूककोंंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनीषानगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे-बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने तो खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येताना तो साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल केला असून आत्माराम चौकापर्यंतचा रस्ता त्याला जोडण्यात येणार आहे. केबल स्टेड टाइपचा हा पूल असणार असून तो दीड किमीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवानाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.>डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचा दावायेत्या डिसेंबर अखेर या पुलाचे काम पूर्ण होईल, असा दावा आता पालिकेने केला होता; परंतु यामध्ये खाडीतील बाधित होणारे कांदळवन हा प्रमुख अडथळा ठरत होता. त्यामुळे येथील ०.२७४ हेक्टर कांदळवनक्षेत्र वळते करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी राज्य शासनाच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) यांनी वनविभागाकडील हे क्षेत्र वळते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खाडीतही पालिकेला पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कदाचित डिसेंबरअखेर तो वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, असा दावा पालिकेने पुन्हा एकदा केला आहे.