शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कल्याण-डोंबिवलीतील नव्या रिक्षांसाठीच्या इरादापत्रास विनामूल्य मुदतवाढ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:17 IST

ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.

ठळक मुद्देरिक्षा चालक-मालक युननियनची मागणी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांना साकडे

डोंबिवली: मागेल त्याला परमीट (इरादा पत्र) या राज्य शासनाच्या बेरोजगारी कमी करण्यासाठीच्या उपक्रमाचे डोंबिवली रिक्षा चालक मालक युनियनने अभिनंद केले, पण ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.यासंदर्भात संस्थेचे उपाध्यक्ष शेखर जोशी, कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, सचिव भिकाजी झाडे आदींनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांना त्यासंदर्भात गुरुवारी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी इरादापत्र मिळाले असले तरी संबंधित लाभार्थ्यांना भेडसावणा-या असंख्य अडचणींमुळे अनेकांनी वाहने घेतलेली नाहीत. इरादापत्राची मुदत ही सहा महिने असते. त्यामुळे इरादापत्र मिळाल्यापासून सहा महिन्यात वाहन खरेदी करुन त्याचे आरटीओकडुन पासिंग करुन घेणे बंधनकारक असते. पण अनेकांकडे कर्ज घेण्यासाठी जी अनामत रक्कम असते ती नसणे, कर्जाच्या बदल्यात रिक्षा या सुविधेत वाहने उपलब्ध नसणे, विविध ठिकाणच्या शोरुममध्ये रिक्षा उपलब्ध नसणे अशा विविध तांत्रिक अडचणींना संबंधित लाभार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागणी आणि तसा पुरवठा बाजारात होत नसल्याने अनेकांना इरादापत्र रद्द होणार असल्याचे दडपण आहे. त्यासाठी परिवहन विभागाने युननियची मागणी तातडीने मान्य करावी आणि हजारो इरादापत्र धारकांना दिलासा द्यावा असे साकडे जोशी यांनी परिवहन अधिका-यांना घातले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRto officeआरटीओ ऑफीस