शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कल्याण-डोंबिवलीतील नव्या रिक्षांसाठीच्या इरादापत्रास विनामूल्य मुदतवाढ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:17 IST

ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.

ठळक मुद्देरिक्षा चालक-मालक युननियनची मागणी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांना साकडे

डोंबिवली: मागेल त्याला परमीट (इरादा पत्र) या राज्य शासनाच्या बेरोजगारी कमी करण्यासाठीच्या उपक्रमाचे डोंबिवली रिक्षा चालक मालक युनियनने अभिनंद केले, पण ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदतीत विनामूल्य वाढ करावी अशी मागणी युनियनने केली आहे.यासंदर्भात संस्थेचे उपाध्यक्ष शेखर जोशी, कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, सचिव भिकाजी झाडे आदींनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांना त्यासंदर्भात गुरुवारी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी इरादापत्र मिळाले असले तरी संबंधित लाभार्थ्यांना भेडसावणा-या असंख्य अडचणींमुळे अनेकांनी वाहने घेतलेली नाहीत. इरादापत्राची मुदत ही सहा महिने असते. त्यामुळे इरादापत्र मिळाल्यापासून सहा महिन्यात वाहन खरेदी करुन त्याचे आरटीओकडुन पासिंग करुन घेणे बंधनकारक असते. पण अनेकांकडे कर्ज घेण्यासाठी जी अनामत रक्कम असते ती नसणे, कर्जाच्या बदल्यात रिक्षा या सुविधेत वाहने उपलब्ध नसणे, विविध ठिकाणच्या शोरुममध्ये रिक्षा उपलब्ध नसणे अशा विविध तांत्रिक अडचणींना संबंधित लाभार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागणी आणि तसा पुरवठा बाजारात होत नसल्याने अनेकांना इरादापत्र रद्द होणार असल्याचे दडपण आहे. त्यासाठी परिवहन विभागाने युननियची मागणी तातडीने मान्य करावी आणि हजारो इरादापत्र धारकांना दिलासा द्यावा असे साकडे जोशी यांनी परिवहन अधिका-यांना घातले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRto officeआरटीओ ऑफीस