शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जिल्ह्यातील १८ हजार बालकांना मोफत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:48 IST

‘आरटीई’ अंतर्गत लाभ : जि.प.ची माहिती

ठाणे : दुर्बल घटकातील बालकांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ठाणे जिल्ह्यातील अनुदानित व खासगी अनुदानित शाळांमध्येदेखील ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून चार वर्षांत शहरी व ग्रामीण भागांतील १८ हजार ४२० मुलांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.आरटीई अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील ६५२ अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यांतील शाळांनी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरली होती. तसेच पालकांनीही ऑनलाइनद्वारे आपल्या पाल्यांचे अर्ज शाळा प्रवेशासाठी दाखल केले. २०१६-१७ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. सर्वाधिक मुलांना प्रवेशजिल्ह्यात चार वर्षांत १८ हजार ४२० बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला. २०१९-२० मध्ये सर्वाधिक पाच हजार ८६६ बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे. तर, २०१६-१७ मध्ये सर्वांत कमी दोन हजार ५५४ बालकांनीच प्रवेश घेतला होता.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा