शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

संचारबंदीतही ठाणेकरांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने राज्यात संचारबंदी लागू केलेली आहे. त्यानुसार आता महापालिकेनेदेखील ठाणे शहरासाठी परिपत्रक ...

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने राज्यात संचारबंदी लागू केलेली आहे. त्यानुसार आता महापालिकेनेदेखील ठाणे शहरासाठी परिपत्रक काढून काय सुरू राहील, काय बंद राहील याची माहिती दिली आहे. परंतु असे असतानाही गुरुवारी सकाळी ठाण्यातील मार्केटमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने नागरिकांनी खरेदीचे कारण देऊन गर्दी केल्याचे दिसून आले, तर कळव्यातील भाजी मार्केटमध्येही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मुख्य मार्केटमध्ये जाण्यास मज्जाव करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड‌्स लावले होते. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात येत होते. तरीदेखील नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत होते.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेनेदेखील शहरात काय सुरू राहील, काय बंद राहील याची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार शहरातील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पातलीपाडा, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितीन कंपनी, तिनहात नाका येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांची कसून चौकशी करूनच सोडले जात होते. परंतु, नेहमीपेक्षा गुरुवारी संचारबंदीच्या पहिल्या दिवशी वाहनांची वर्दळ कमी होती. परंतु रिक्षा, सार्वजनिक वाहतूक, खासगी बस सुरू असल्याने त्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली दिसत नव्हती. नागरिक सहज या सेवांतून प्रवास करताना दिसत होते. शहरातील जांभळीनाका, स्टेशन परिसरातील मार्केटमध्येदेखील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने येथे सकाळी नागरिकांची गर्दी दिसत होती. या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड‌्स लावले होते. तरीदेखील पळवाटा काढून नागरिक अत्यावश्यक सेवेचे कारण देऊन येथे ये-जा करताना दिसत होते. तसेच शहरातील इतर ठिकाणीदेखील तुरळक प्रमाणात वर्दळ दिसत होती. कळव्यातही भाजी मार्केटमध्ये सकाळीच गर्दी झाल्याचे दिसत होते. घोडबंदर भागात सकाळच्या सत्रात मॉर्निंग वॉकला नागरिक बाहेर पडल्याचे दिसत होते, तर शहरापासून दूरच्या ठिकाणी असलेल्या भागांमध्येही नागरिकांची कमी-जास्त प्रमाणात वर्दळ दिसून आली. यामुळे १०० टक्के संचारबंदीचे पालन नागरिकांनी केलेले दिसले नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका तरीदेखील किती टक्के बंद आहे, हे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते.