शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आगरी शालेचे चौथे सत्र संपन्न, आगरी शालेन आला...दादूस दुबईवाला....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:49 IST

आगरी शालेचे चौथे सत्र ५-६ मे रोजी कशेळी येथील मराठी शाळेत पार पडले.

ठळक मुद्देआगरी शालेचे चौथे सत्र संपन्न आगरी शालेन आला...दादूस दुबईवाला....आपल्या भागात आपली बोली बोलायला पाहिजे - मंगेश पाटील

ठाणे : आगरी बोली प्रचार-प्रसाराच्या संवर्धनाच्या उद्देशार्थ युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या संकल्पनेतून ‘आगरी शाला’ हा अभिनव उपक्रम सुरू  झाला असून सर्व स्थरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे या शाळेचे चौथे सत्र ५-६ मे रोजी कशेळी येथील मराठी शाळेत पार पडले. 

   ५ मे रोजी प्रा. सदानंद पाटील यांनी आगरी बोली जडण-घडण विषयीचे सत्र घेतले त्यात त्यांनी 'आगरी बोली मुळत: शुध्द बोली असून तिचा प्रसार माध्यमातला चुकीचा वापर थांबला पाहिजे' असे सांगीतले. त्या नंतर दुसरे सत्र मोरेश्वर पाटील यांनी 'आगरी भाषेचे मुळ' या विषयी घेतले व आगरी भाषा फार पूरातन बोली आहे हे बुचर (Butcher island)’ नावाच्या घारापूरी बेटाजवळील 'आगर भूमितील' अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे व वेगवेगळ्या शिलालेखांचे दाखले देत आगरी बोली फार पुरातन बोली असल्याचे सांगीतले. त्याच बरोबर आगरी बोली शिकायची सोपी पध्दत-आपल्या वाक्यात *वं* आणि *न* चा योग्य वापर करणे.'वं' म्हणजे 'च्या वर' आणि 'न' म्हणजे च्या मध्ये. उदा.शेतावं,खल्यावं,रस्त्यावं. शेतान,खल्यान,रस्त्यान. ईत्यादी. सांगीतली. ६ मे रोजी उरणहून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.एल बी पाटील आले होते. त्यांनी आगरी साहित्याचे दाखले देत परेन जांभळे,शंकर सखाराम यांची आवर्जून आठवण काढली. त्याच बरोबर आगरी बोलीत पौरहित्य करण्याऱ्या धवलारीन यांच मौखिक स्वरुपातील साहित्य जर का पुस्तकरूपात छापले असते तर जगातील सगळ्यात जास्त लेखिका आगरी समाजातल्या ‘धवलारीनी’ असत्या असे प्रा.एल.बी पाटील यांनी मत प्रकट केले. विशेष म्हणजे या सत्रा दरम्यान दुबईमध्ये अभियंता म्हणून काम करणारे मंगेश पाटील थेट दुबईवरून विडीओ काॅल च्या माध्यमातून या सत्रात सहभागी झाले होते. दुबईमध्ये असून देखील तेथे आवर्जून आपली बोली बोलत विडीओ ब्लाॅग तयार करत  मंगेश पाटील ‘दुबईकर दादुस’ या नावाने समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द आहेत. 'आपली बोली भाषा जर का मी विदेशात बोलून प्रसिध्द होऊ शकतो तर आपल्या माणसांनी नक्कीच आपल्या भागात आपली बोली बोलायला पाहिजे' असे मत मंगेश पाटील यांनी व्यक्त केले तसेच आगरी शालेत सर्वांनी सहभागी व्हा यासाठी आवाहन केले. आगरी शालेचे पुढील सत्र १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी ४ ते ६ या वेळात कशेळी येथे होणार असल्याचे कवी सर्वेश तरे यांनी सांगीतले आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई