शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

साडेसोळा लाखांचा कौल निर्णायक

By admin | Updated: October 10, 2014 01:49 IST

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पालघर जिल्हयातील ६ मतदारसंघात सुमारे १६ लाख ६१ हजार १२२ मतदार आपल्या मताचा अधिकार वापरणार

दिपक मोहिते, वसई१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पालघर जिल्हयातील ६ मतदारसंघात सुमारे १६ लाख ६१ हजार १२२ मतदार आपल्या मताचा अधिकार वापरणार आहेत. यापैकी ८ लाख ७३ हजार ८३० पुरूष व ७ लाख ८७ हजार २०६ महिला मतदार आहेत. तर इतर मतदारांची संख्या ८६ इतकी आहे. सदर निवडणुक शांततेत पार पडावी याकरीता निवडणुक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.यंदाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदार नालासोपारा येथे आहेत. या मतदारसंघात एकुण ३ लाख ९६ हजार १९१ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख १८ हजार १८५ पुरूष तर महिला मतदारांची संख्या १ लाख ७७ हजार ९६२ इतकी आहे. या मतदारसंघात इतर मतदारांची संख्याही अन्य मतदारसंघातील मतदारांपेक्षा सर्वाधिक आहे. येथे ४४ इतर मतदार मतदान करतील. वसई येथे एकुण मतदार २ लाख ९० हजार ९१४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५० हजार ६११ पुरूष तर १ लाख ४० हजार ३०१ महिला व इतर २ मतदार आहेत. पालघर येथे २ लाख ४१ हजार ४४ मतदार असून १ लाख २३ हजार ९९४ पुरूष व १ लाख १७ हजार ४३ महिला मतदार आहेत. येथे इतर मतदारांची संख्या ७ इतकी आहे. डहाणू येथे एकुण २ लाख ३४ हजार १६२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. त्यापैकी १ लाख १८ हजार ८९१ तर १ लाख १५ हजार २६७ मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या ४ इतकी आहे. विक्रमगड येथे २ लाख ४६ हजार ४३१ मतदार असून १ लाख २५ हजार ७१० पुरूष तर १ लाख २० हजार ७२१ मतदार महिला आहेत. येथे एकही मतदार इतर नाहीत. बोईसर मतदारसंघात २ लाख ५२ हजार ३८० मतदार असून १ लाख ३६ हजार ४३९ पुरूष तर १ लाख ५० हजार ९१२ महिला मतदार आपला हक्क बजावतील. येथे एकुण २९ इतर मतदार आहेत.६ मतदार संघापैकी बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमगड हे ४ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. तर वसई व नालासोपारा हे २ मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुले आहेत. या सहाही मतदारसंघात विविध राजकीय पक्षामध्ये ५८ उमेदवार आपले नशिब आजमावीत आहेत. १२८ विक्रमगड - १२, १२९ डहाणू - १२, १३० पालघर - ८, १३१ बोईसर - १०, १३२ नालासोपारा - ८, १३३ वसई - ८ असे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आपले नशीब आजमावीत आहेत. १५ आॅक्टोबरला चित्र स्पष्ट होणार आहे.