शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:57 IST

शेजारची लहान मुले दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली.

मीरा रोड : शेजारची लहान मुले दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेजारी राहणाºया १९ वर्षाच्या तरूणास अटक केली आहे.आझादनगरला पालिकेच्या भूखंडावर बेकायदा झोपड्या, बांधकामे, कचºयाची गोदामे आहेत. तेथील कच्च्या झोपडीत इसरार शेख हे पत्नी, दोन मुले, दोन मुलींसह राहतात. शेजारच्या झोपड्यात काही कचरा - भंगार गोळा करणारे एकत्र राहतात. इसरार यांची मुले लहान असल्याने ते लघुशंका आदी शेजारच्या झोपड्यांजवळ करत असल्याने त्यावरून रहिम शौकत अली शेख (१९) याचे इसरार याच्याशी भांडण होत असे. रहीम हा लहान मुलांना देखील दमदाटी, शिवीगाळ करत असे.मंगळवारी रात्री इसरार यांची ४ वर्षाची मुलगी आफरीन ही दिसत नसल्याने घरच्यांसह परिसरातील रहिवाशांनी तिच्या शोधासाठी धापवळ सुरू केली. आफरीन बेपत्ता असल्याचे नवघर पोलिसांना कळवले. त्यांनीही शोधाशोध सुरु केली. त्याचवेळी रहीमसुध्दा बेपत्ता होता.आझादनगर मस्जिद मागील कचºयाच्या ढिगाºयातून विव्हळण्याचा आवाज तेथील एका रहिवाशाला आल्यानंतर पोलीस व अन्य लोकांनी धाव घेत पाहणी केली असता आफरीन ही जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आढळली. तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या डोक्यावर, चेहºयावर जखम झालेली आहे. डोक्याला पाच ठिकाणी जखमा झाल्या आहेत.पोलीस व रहिवाशी हे रहीमचा शोध घेत असताना अनिस खान उर्फ मुन्ना, सलीम मनिहार आदींना रहीम हा क्रीडा संकुलामागील भागात लपलेला दिसला. नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आफरीन रात्री लघुशंकेसाठी गेली असता रहीमने तिला हटकले व रागाच्या भरात डोक्यावर रॉडने मारले. नंतर तिला कचºयात टाकून दिल्याची कबुली दिली.हत्या व गुन्ह्यांना महापालिका जबाबदार ?आझादनगर व मागील परिसर हा खेळाचे मैदान, सामाजिक वनीकरण या आरक्षणाखाली राखीव असून मोठ्या प्रमाणात पालिकेने टीडीआर देऊन जागा मिळवली आहे. परंतु या ठिकाणी झोपड्या, बांधकामे, भंगार व कचरयाची गोदामे आदींचे सर्रास अतिक्रमण झालेले असतानाही पालिका मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत या अतिक्रमणांना पाठीशी घालत आहे.याआधी ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करून मृतदेह याच भागात टाकला होता. पवई येथून अपहरण करून आणलेल्या १० वर्षाच्या मुलासही येथे मारुन टाकले होते.तरीदेखील पालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले नसून भूखंडदेखील कुंपण घालून ताब्यात घेतलेला नाही. पालिकेच्या डोळेझाक पणामुळे येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे मात्र सतत घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा