शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भिवंडीमध्ये कारखान्याच्या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: February 20, 2017 04:36 IST

भिवंडी तालुक्यातील दापोडा गावाच्या हद्दीत प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्यास रविवारी दुपारी सव्वाअकराच्या

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडा गावाच्या हद्दीत प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्यास रविवारी दुपारी सव्वाअकराच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यात तीन महिलांचा समावेश आहे. दोन जखमी कामगारांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले आहे.दापोडा येथील हरिहर कंपाउंडमध्ये देढिया प्लास्टिक कंपनीत प्लास्टिक दाण्यापासून कृत्रिम मोती बनविण्याचा कारखाना आहे. त्यामध्ये सुमारे १५ ते १७ कामगार काम करीत होते. येथे मोती बनविण्यासाठी रसायनाचा वापर होतो. या रसायनांच्या साठ्यास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजल्यानंतर कामगारांनी कारखान्याबाहेर धाव घेतली. काही क्षणांतच रसायन व प्लास्टिकच्या दाण्याने पेट घेत आगीने रौद्ररूप धारण केले. चारही बाजूने आगीने कारखान्यास वेढल्याने चार कामगार बाहेरच पडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलासह ठाणे, भार्इंदर व कल्याणहून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. चार तासानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर चार कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)मृतांची नावे : सारिका अनंत दासरी (४५),निर्मला मधुकर जादूगर (३५), अनुराधा ज्ञानेश्वर निंबोले (२७) व मनोज (२०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.