शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून तब्बल चारपट जास्त खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 04:29 IST

निवडणूक आयुक्त : मतदानाच्या निरुत्साहावर चिंता

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा किमान चारपट जास्त खर्च करतात, असा गौप्यस्फोट राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केला. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत, अधिक शिकलेल्या मंडळींमधील मतदानाचा अनुत्साह ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी लब्धप्रतिष्ठितांचे कान टोचले. या वर्गाचे मतदान वाढले पाहिजे. निवडणुकांमध्ये पैशांच्या बळाचा आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या दुरुपयोगाबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

नवी मुंबई येथील ज्ञान केंद्र सभागृहात कोकण विभागीय कार्यशाळा अलीकडेच पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, मध्यंतरी गोखले इन्स्टिट्यूटकरवी आम्ही यावर अभ्यास करवून घेतला. तेव्हा असे निदर्शनास आले की, पक्ष आणि उमेदवार नेमून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा चारपट जादा खर्च करत आहेत. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, निवडणुकांमध्ये पैशांचा आणि समाजमाध्यमांचा दुरु पयोग रोखणे, हे आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘सुदृढ लोकशाहीसाठी सुदृढ निवडणुका’ या विषयावर या कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी यावेळी महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. पाटील यांनी कार्यशाळा घेण्यामागची भूमिका स्पष्ट करून चांगल्या गोष्टी घडत असतील, तर श्रेयवाद उपस्थित करून अडथळे आणण्याचे काम काही मंडळी करतात, अशी टिप्पणी केली. याकडे दुर्लक्ष करून निवडणूक यंत्रणा बळकट करावी, असे आवाहन केले.अर्ज रद्द होण्याचे प्रमाण घटलेनामनिर्देशन आणि शपथपत्र संगणकीकृत करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण घटल्याचे यावेळी उघड झाले. विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश करणाऱ्याविद्यार्थ्याने प्रवेश अर्जाच्या वेळी मी मतदारनोंदणी केली नसल्यास ती करेन, असे लिहून देणे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी देणे, याविषयीहीआवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी निवृत्त अपर मुख्य सचिव शहजाद हुसैन, सर्व जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापौर आणि आयुक्तांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक