शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दरोड्यासाठी दोघांचे खून करणाऱ्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निर्णय

By जितेंद्र कालेकर | Updated: June 7, 2023 21:04 IST

मोक्कांतर्गतही झाली कारवाई

ठाणे : दरोड्यासाठी एका बारमालकासह दोघांचा खून करणाऱ्या जांबूआ टोळीतील अमरू मांगो बबेरिया (२२), राजू मेढा (१९), उदयसिंग ऊर्फ छोटू बबेरिया (२१) आणि बापूसिंग सिंगाढे (२०, सर्व रा. जांबूआ जिल्हा, मध्य प्रदेश) यांना खून आणि दरोड्यात जन्मठेप तसेच प्रत्येकी एक लाखांच्या दंडाची त्याचबरोबर मोक्कांतर्गत जन्मठेपेसह प्रत्येकी पाच लाखांच्या दंडाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा व सत्र तथा मोक्का न्यायाधीश अमित शेटये यांनी बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावल्याची माहिती विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या अवधनगर भागातील आपले देशी बारचे दुकान बंद करून बारमालक राकेश मोरे (३१) हे १७ फेब्रुवारी २०१० रोजी मोटारसायकलीवरून घरी निघाले होते. त्याचवेळी दरोडेखोरांची सशस्त्र टोळी आली होती. त्यांनी राकेशकडील पैशांची बॅग खेचण्याच्या प्रयत्न केला. त्याला त्याने जोरदार प्रतिकार केला. तेव्हा उदयसिंग याने राकेशच्या छातीवर गोळीबार केला. ही गोळी त्याच्या छातीतून आरपार जाऊन पाठीतून बाहेर गेली. यात त्याच्याकडील पैशांची बॅग राुद्राक्षाची सोन्याची माळ, पैशांचे पाकीट, मोबाइल आणि सोन्याच्या अंगठ्या असा एक लाख ६८ हजारांचा ऐवज दरोडा टाकून पळ काढला.

पळताना काही अंतरावरच आणखी एकाकडे त्यांनी पैसे आणि मोबाइलच्या जबरी चोरीसाठी गोळीबार केला होता. या दोघांच्या खुनानंतर अमरू, राजू आणि बापूसिंग यांना २० ऑगस्ट २०१० रोजी तर उदयसिंग याला १२ मे २०११ रोजी बोईसर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. यातील बसू याला दहा वर्षांनंतर अटक झाल्यामुळे त्याचा खटला अद्याप प्रलंबित आहे. तर सहावा मोहनसिंग वसुनिया हा अजूनही पसार आहे.पोलिस ठाण्यातून पसार

अटकेनंतर पाचही आरोपींनी पालघर पोलिस ठाण्याची कौले तोडून पलायन केले होते. याप्रकरणीही त्यांच्याविरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे खून करण्यापूर्वी ते मनोरच्या एका गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटले होते. अटकेनंतर त्यांच्याकडून दागिने, मोबाइल, रोकड तसेच तीन गावठी कट्टे आणि १२ काडतुसे हस्तगत केली होती. पळाल्यानंतर चौघांना बोईसरमधील घरातून अटक झाली होती. बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी एन. के. मुरादे यांनी या प्रकरणाचा तपास केला.खून, दरोडयासह २५ गंभीर गुन्हे-

अमरु आणि त्याच्या टोळीवर खून, दरोडयासह २० ते २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका गुन्हयात अमरु आणि उदयसिंग यांना चार वर्षांची शिक्षा झाली होती. यात ते जामीनावर सुटले होते. याच काळात त्यांनी हे दोन खूनासह दरोडयाचा प्रकार केला होता. या खटल्यात २२ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी आरोपींच्या शिक्षेसाठी जोरदार बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार शिर्के यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे