शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

ठाण्यातील कोपरी रेल्वे पुलावर चार लोखंडी तुळई बसविण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पूर्व द्रूतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाजवळील भुयारी मार्गावर लोखंडी तुळई बसविण्याचे ...

ठळक मुद्देपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निगराणीखाली झाले काम रेल्वेने प्रथमच आणली १२०० टन वजन पेलणारी महाकाय क्रेन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्व द्रूतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाजवळील भुयारी मार्गावर लोखंडी तुळई बसविण्याचे काम रविवारी पहाटे काही प्रमाणात पूर्ण झाले. उर्वरित काम आता रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी या वेळेत पूर्ण केले जाणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हेही यावेळी उपस्थित होते.मध्य रेल्वेच्या कोपरी पूलावर पहिल्या टप्यातील सात लोखंडी तुळई (गर्डर) पैकी चार गर्डर रविवारी पहाटेपर्यंत बसविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही रविवारी पहाटे २.३० वाजेपर्यंत या कामाच्या निगराणीसाठी उपस्थित होते. ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील तसेच मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (प्रकल्प निर्माण) एस. एस. चतुर्वेदी, उप अभियंता (प्रकल्प निर्माण) डी.डी. लोळगे, स्टेशन डेव्हलपमेंट मुख्य अभियंता आर. के. मिश्रा, उप अभियंता (पूल) अखिलेश सक्सेना, मध्य रेल्वे वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भामरे आणि कार्यकारी अभियंता विनय सुर्वे आदी अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे काम पार पडले. प्रत्येकी १०४ टन वजनाचे आणि ६५ मीटर लांबीचे चार गर्डर मुंबई ते ठाण्याच्या दिशेने बसविण्यात आले. हे गर्डर उचलण्यासाठी भारतात प्रथमच मध्य रेल्वे प्रशासनाने १२०० टन वजन पेलणारी क्र ेन कोपरी येथे पाचारण केली होती. त्यामुळे हा महत्वपूर्ण ऐतिहासिक क्षण याचि देहि याचि डोळा पाहण्यासाठी रेल्वेचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी याकिाणी उपस्थित होते. हे गर्डर बसविण्यासाठी सात क्र ेन, दोन पुलर आणि १५० हून अधिक मनुष्यबळ तैनात होते.* यानंतर ठाणे ते मुंबई बाजूसाठी असेच तीन गर्डर बसविण्यात येणार आहेत. याआधी एमएमआरडीएने १६ आणि १७ जानेवारी रोजी ३५ मीटर लांब आणि प्रत्येकी ३५ टन वजनाच्या सात तुळई अवघ्या सात तासांमध्ये बसविल्या होत्या.* तुळई बसविण्याच्या कामामुळे मुंबईतून ठाण्याकडे येणारी वाहतूक मुलूंडमध्ये मोठया प्रमाणात तुंबली होती. त्यामुळे अनेकांना अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दोन ते तीन तासांची कसरत करावी लागली. या वाहतूकीवर नियंत्रण आणतांना मुंबई पोलिसांची मोठी दमछाक झाल्याचे पहायला मिळाले. त्या तुलनेत ठाणे शहरात मात्र, पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरु होती.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी