शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

‘त्या’ सोसायटीतील माजी पदाधिकारी भीतीखाली, पोलिसांत तक्रारअर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 01:46 IST

सोसायटीच्या कमिटीच्या वादाला कंटाळून राजेंद्र सोनवणे (४८) यांनी आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती.

कल्याण : सोसायटीच्या कमिटीच्या वादाला कंटाळून राजेंद्र सोनवणे (४८) यांनी आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. याप्रकरणी सोसायटीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याच सोसायटीतील अन्य काही रहिवाशांनाही त्रास देण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. या त्रासाला कंटाळलेल्या सोसायटीतील माजी पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले चौक पोलिसांकडे मंगळवारी तक्रारअर्ज दिला आहे.प्रेम आॅटो परिसरातील विशाल राज सोसायटीतील माजी पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सोसायटीच्या कमिटीच्या त्रासाला कंटाळून सोनवणे यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनवणे यांच्याप्रमाणेच आम्हालाही सोसायटीच्या कमिटीकडून त्रास दिला जात आहे. २०११ ते २०१७ या कालावधीत सोसायटीच्या पदाधिकाºयांनी देवराज चव्हाण याच्या सल्ल्याने आणि संमतीनेच कामे केली आहेत. त्यामुळे सोसायटीचा जो काही आरोप आहे, तो त्यांच्यावरसुद्धा लावायला हवा होता. पण, नवीन कमिटीने माजी पदाधिकाºयांवरच गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. ही बाब कमिटीच्या निदर्शनास आणून दिली असता आमच्या त्रासात अजूनच वाढ झाली. देवराजमुळे सोसायटीला खूप त्रास झाला असून सुनंदा सावंत या कोणत्याही पदावर नसताना सोसायटीच्या कारभारात हस्तक्षेप करतात. त्याचबरोबर, हारुण सय्यद हा सुद्धा रस्त्याने जातायेता शिवीगाळ करणे, सोसायटीचे पैसे परत कधी करणार, याबाबत सतत विचारणा करून त्रास देतात. आमच्यासह आमच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास झाल्यास देवराज, सुनंदा आणि हारुण यांना जबाबदार धरावे, अशी तक्रार दोघा माजी पदाधिकाºयांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप तिघांना अटक केली नाही. त्यामुळे आम्ही दहशतीच्या वातावरणात राहत असल्याचे सोनवणे यांचे भाऊ सुनील यांनी सांगितले.