शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम यांची रेल्वेखाली आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: March 29, 2023 15:21 IST

ठाणे रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरु

ठाणे : माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा दरम्यान उपनगरी रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९.०५ वाजताच्या सुमारास घडली. अभियंता अनंत करमुसे प्रकरणी ठाणे पोलिसांकडून त्यांची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरु होती. आता या आत्महत्या प्रकरणाचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचेनेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, मुबंई पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलात (एसपीयू) मध्ये नेमणूकीला असलेल्या कदम यांचा आव्हाड यांच्या ठाण्यातील "नाद' बंगल्यावर करमुसे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश होता. यात अटक झाल्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली होती. त्यांची याच प्रकरणात गेल्या काही दिवसापासून ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु होती. त्यामुळेही ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.

बुधवारी सकाळी दिवा ते रोहा अशी जाणाऱ्या मेमो उपनगरी खाली निळजे ते तळोजा दरम्यान त्यांनी स्वतःला झोकून दिले. घटनास्थळी त्यांचे शीर आणि हात धडावेगळे झाले. त्यांना तातडीने तशाच अवस्थेत दिवा येथील बालाजी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याकडे मोबाईल आणि काही पैसे मिळाल्याचे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.आरोपी नसल्याचे मोबाईलवर ठेवले स्टेट्स वैभव यांनी मृत्यू पूर्वी आपल्या मोबालवर एक स्टेट्स ठेवले आहे. पोलीस आणि मीडियाला विनंती आहे की, यात आपण आरोपी नाही, असा मजकूर यामध्ये आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे