शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सर्व वाद विसरून हिंदुत्वासाठी सगळ्यांनी एकत्र व्हावं; कालीचरण महाराजाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 15:22 IST

पूर्वी जे काही घडलं त्यामुळे उत्तर भारतीय नागरिक नाराज आहेत जेव्हा आपण हिंदुत्व हातात घेतो तेव्हा सर्व भारतीयांनी एकत्र व्हावे असं कालीचरणने सांगितले आहे.

ठाणे – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी औरंगाबादमध्ये औरंगजेबाचं कबरीवर माथा टेकवल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपा-मनसेसह शिवसेनेनेही यावर भाष्य करत औवेसींना इशारा दिला आहे.  औरंगाबादला माथा टेकवून त्यांनी त्यांचा तो हिरो असल्याचं दाखवून दिलं. हिंदुत्वासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन कालीचरण महाराजनं केले आहे.

ठाण्यात पत्रकारांशी कालीचरणनं संवाद साधला. त्यावेळी म्हणाले की, जे धर्मवीर आहेत ज्यांनी हिंदूंसाठी काम केलं आहे अशा लोकांसाठी हा चित्रपट येत असेल तर माझं सर्व प्रथम कर्तव्य आहे आणि यामधून मी लोकांना प्रोत्साहन करतो जे हिंदूंसाठी काम करतात त्यांना अधिक पाठिंबा मिळाला पाहिजे. प्रजा सर्व बघत आहे की नक्की हिंदुत्व रक्षण कोण करत आहे. प्रजेला सर्व माहित आहे. शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी राज्य स्थापन करण्याची गोष्ट केली. कधी भाषा स्थापनेची गोष्ट केली नाही. भाषा वाद, वर्ण वाद, प्रांत वादामुळे जातीय वादामुळे हिंदुत्वाचा नाश होत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पूर्वी जे काही घडलं त्यामुळे उत्तर भारतीय नागरिक नाराज आहेत जेव्हा आपण हिंदुत्व हातात घेतो तेव्हा सर्व भारतीयांनी एकत्र व्हावे. परंतु भाषेचा विषय घेतला तर सर्वच भाषा वेगळ्या होतील. राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे त्यामुळे मी मात्र त्यांना समर्थन करत आहे. औरंगाबादला माथा टेकवून त्यांनी त्यांचा तो हिरो असल्याचं दाखवून दिलं आपण हिंदू अनेक वादात अडकून बसला आहे. आपण सगळे वाद सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र झालं पाहिजे तेव्हा हिंदुत्व टिकेल हे आताच्या नेत्यांना कळलं पाहिजे असंही कालीचरणने सांगितले.

महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण - शिवसेना

"संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळालं नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळं सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. जे औरंगजेबाचं झालं तेच त्याच्या भक्तांचंही होईल" असा घणाघात संजय राऊत यांनी केला.