शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

अर्थसंकल्पात शाई धरणाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:20 IST

ठाणेकर तहानलेलेच : लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाची अनास्था

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात ३० टक्के पाणीटंचाई असताना आणि नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील अनेक गृहसंकुलांनी पाणीटँकरचा आधार घेतलेला असतानाही यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या ऊहापोहाशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रस्तावित शाई धरणाविषयी काहीच उल्लेख नाही. यामुळे महापालिकेने शाई धरणाच्या कामातून काढता पाय घेतला की काय, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

भविष्यातील ठाणेकरांची तहान भागावी, या उद्देशाने महापालिकेने मोठ्या प्रयत्नानंतर शाई धरणाचा प्रकल्प खेचून आणला होता. किंबहुना, त्याला मंजुरी मिळवून २००७ मध्ये जलसंपदा विभागाला शाई धरणासाठीचे सर्वेक्षण आणि खर्चाचा आराखडा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, याचा सर्व्हेदेखील पूर्ण झाला असून ४५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. परंतु, लोकप्रतिनिधींनी अनास्था दाखवून हे धरण उभारण्याची क्षमता नसल्याचे कारण पुढे करून त्याचे काम एमएमआरडीएने करावे, असे सूचित करून त्यातून मिळणारे पाणी ठाण्याबरोबरच इतर महापालिकांना द्यावे, असे सुचवले. यामुळे तीव्र पाणीटंचाईला तोंडद्यावे लागत असल्याने ठाणेकर त्रस्त झाले आहेत.खर्च १४०० कोटींवर : ठाणेकरांना हक्काचे धरण मिळाले असते, तर २०४६ पर्यंतची तहान ठाणेकरांची यामुळे भागू शकली असती. दरम्यान, या धरणाचा खर्च ४५० कोटींवरून १४०० कोटींच्या आसपास गेला आहे, त्यामुळे आता तो पालिकेच्या डोक्यावरून जाणार आहे. विशेष म्हणजे हे धरण झाले असते, तर इतर स्रोतांकडून पाण्यासाठी केला जाणारा खर्च हा ५० टक्कयांवर आला असता आणि ठाणेकरांना त्याच पैशांतून हक्काचे धरणही मिळाले असते. परंतु, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या अनास्थेने यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचा विसर पडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका