शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

वन विभागाने सुरू केला पुन्हा नव्याने सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

ठाणे : कळव्यातील घोलाई नगर भागात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेल्याने वन विभागावर टीकेची झोड उठू ...

ठाणे : कळव्यातील घोलाई नगर भागात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेल्याने वन विभागावर टीकेची झोड उठू लागली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या वन विभागाने आता मंगळवारपासून पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा सर्व्हे पुन्हा नव्याने सुरू केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील अशा घटनांनंतर वन विभागाने अशा सर्व्हेपलिकडे काही केलेले नाही. त्यामुळे आता तरी काही ठोस कारवाई वन विभाग करणार का? असा प्रश्न करण्यात येत आहे.

पुढील दोन दिवस हा सर्व्हे केला जाणार असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरविली जाईल; परंतु ही कारवाई अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या किंवा डोळेझाक करणाऱ्यांवर होणार का? याचे उत्तर मात्र सध्यातरी यातील कोणत्याही यंत्रणेकडे नाही. कळवा घोईल नगर भागात पारसिक टेकडीवर मागील कित्येक वर्षांपासून शेकडो झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. दरवर्षी त्या वरवर सरकताना दिसत आहेत; परंतु त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यातूनच सोमवारी दरड कोसळून पाच जणांचा बळी गेला. त्याची जबाबदारी आता कोण घेणार, कारवाई कोणावर होणार, भूमाफियांना अटकाव बसणार का?असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. आता वन विभागावर टीकेची झोड उठल्यानंतर आता त्यांनी या भागातील झोपड्यांचा सर्व्हे सुरू केला आहे.

महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीने प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने वारंवार वन विभागाशी पत्रव्यवहार करून या झोपड्यांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. यावर्षीही पावसाळा सुरू होण्याआधी मे महिन्यात वन विभागाला पत्र पाठवले होते; मात्र वनविभाग गाफिल राहिल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.