शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

दुसऱ्या-तिसऱ्यांदा टेम्पो भरून मद्य वाहतूक करणार्यांवर मोकाखाली कारवाई! - देसाई

By सुरेश लोखंडे | Updated: October 31, 2022 18:18 IST

एखाद्या राज्यातून दुसरा राज्यामध्ये मद्याच्या काही बॉटल आणण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही लोक टेम्पो,अनेक वाहन भरून आणतात

ठाणे :

एखाद्या राज्यातून दुसरा राज्यामध्ये मद्याच्या काही बॉटल आणण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही लोक टेम्पो,अनेक वाहन भरून आणतात, अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. एकच व्यक्ती दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा गुन्हा करताना आढळला तर त्याच्यावर मोका लावण्यात येईल. असा गुन्हा केलेल्या व्यक्ती आम्ही शोधत आहोत. अशी व्यक्ती आढळल्यास मोकासाठी त्याचा प्रस्ताव आम्ही पोलीस महासंचालकरांकडे पाठवणार, माझ्या विभागातील आयुक्तांना असे आदेश देण्यात आलेले आहेत, असे उत्पादन शुल्क मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात स्पष्ट केले.

राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये जिजाऊ सामाजिक संस्थेच्यावतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्यकरणाºया विशेषत: महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी महिलांसाठी कृतज्ञतेची भाऊबीज हा उपक्रम घेतला. त्यासाठी देसाई ठाण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या राज्यातून दुसरा राज्यामध्ये काही बॉटल आणण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही लोक टेम्पो तसेच अनेक वाहन भरून आणतात. हा एकच गुन्हा दुसºयांदा, तिसऱ्यांदा करणाऱ्या व्यक्तीवर मोका लावण्याचा प्रस्ताव आम्ही पोलीस महासंचालकरांकडे पाठवणार आहे. माझ्या विभागातील अधिकाºयांना आदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कोरोना काळात वापरलेल्या निधीची कॅटव्दारे चौकशी करणार असल्याचे त्यांना विचारले असता ‘मुख्यमंत्री यांनी अशा प्रकारचे आदेश दिले असेल तर त्या पद्धतीने चौकशी केली जाईल. शेवटी पैसा जनतेचा आहे. कोविडच्या काळात लोकांच्या गरजेसाठी, आरोग्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. जर यात काही गैरव्यवहार आढळून आले असतील तर चौकशी केली जाईल व चौकशी अंती हे सर्व पुढे येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. सुरक्षा काढण्याविषयी ते म्हणाले, ज्या व्यक्तींना सुरक्षिततेची आवश्यकता आहे. त्यांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस विभागाकडे एक वरिष्ठ अधिकाºयांची समिती आहे. ती समिती सुरक्षितेचा आढावा घेत असते व त्यानुसार सुरक्षा वाढवली जाते किंवा कमी केली जाते. हा पोलिसांच्या नियमित कामकाजाचा भाग आहे. अधिकारी सगळे अहवाल तपासूनच त्या व्यक्तीची सुरक्षा कमी किंवा वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी शिवसैनिकांचे कवच असल्याचे खासदार विनाकत राऊन यांनी सांगित्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता त्यासाठी त्यांचे स्वागत असल्याचे देसाई म्हणाले. उद्योगांबाबत ते म्हणाले आमचं सरकार आल्यानंतर तीन महिन्यात आम्ही उद्योगांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे एकही उद्योग बाहेर गेला नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्याबरोबर कोणी चर्चा केली नाही? मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झालेली नाही, हाय पावर कमिटीची बैठक झाली नाही. त्यांच्या काळात जी दिरंगाई झाली त्यांना कंटाळून हे उद्योग बाहेर गेलेले आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांपेक्षा मोठे उद्योग आणण्याची चर्चा केंद्राशी करत आहेत असल्याचे सुतोवाच देसाई यांनी केले.