शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जिल्ह्यातील शेतीसह जनावरांसाठी अधिकाऱ्यांकडून आता वनराई बंधाऱ्याची कामे!

By सुरेश लोखंडे | Updated: November 21, 2022 19:04 IST

‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली कामे

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली जिल्ह्यातील अधिकारी ग्रामीण, दुर्गम भागातील शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवत आहे. त्यांच्यासोबत राहून त्यांच्या समस्या एकूण घेण्यासह त्यांच्या विविध विषयावर हितगुज करीत असताना आता शेतीसाठी पाणी आडवण्याचे कामही अधिकारी करीत आहेत. यासाठी वाहत्या नदी, नाल्याचे पाणी वनराई बंधाऱ्याद्वारे अडवण्याचे काम सध्या केले जात आहे. यास अनुसरून भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील शिवारात अधिकाऱ्यांनी वनराई बंधारा घालून पाणी अडवले आहे.

शेतकऱ्यांसोबत एक दिवस राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना धीर देण्यासह शेतीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचे मार्गदर्शन ‘माझ्या बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली अधिकारी करीत आहेत. यासह आता वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर शेतीसाठी म्हणजे रब्बी पिकासाठी करता यावा, गायीगुरांसह जनावरांना उन्हाळ्यात पाणी मिळावे आदीसाठी अधिकाºयांकडून वनराईबंधारे बांधले जात आहे.

याप्रमाणे भिवंडी तालुक्यातील कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी मंडळ अधिकारी आर.ड. शिरसाट आदींसह क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची साप्ताहिक बैठक वापे येथील क्षेत्रावर घेतली . या आढावा बैठकीनंतर ‘एक दिवस बळीराज्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत सर्व कृषी सहाय्यक, अंबाडी व अनगांव येथील कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी अंबाडी येथील नदीवर वनराई बंधारा बांधला आहे.

अधिकाऱ्यांनी २५.५० मीटर लांब व एक मीटर उंचीचा बंधारा घातला आहे.  वनराई बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची २०५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर या क्षेत्रात तब्बल एकूण पाच टीसीएम पाणीसाठा तयार झाल्याचे सुतोवाच जिल्हा कृषी अधीक दिपक कुटे यांनी लोकमतला सांगितले. या बंधाऱ्यातील पाण्यामुळे तब्बल १५ हेक्टर शेती ओलीताखाली येणार असून त्यामुळे १२ शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होणार असल्याचे कुटे यांनी लक्षात आणून दिले. या वनराई बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना आता मिरची, भेंडी, मोगरा, आंबा आदी भाजीपाल्यासह फळबागांना वाढवणे शक्य होत आहे. या वनराई बंधाऱ्यांच्या कामात तालुका कृषी अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी कृषी पर्यवेक्षक संजय घुडे, बाळकृष्ण गायकवाड, गुरुनाथ शेलार, कृषी सहाय्यक विवेक दोंदे, नरेश बुजड, देवेंद्र गावंडा, हर्षल पाटील, स्नेहल वळंज, नूतन पाटील, अर्चना धलपे आदींनी श्रमदान करून बळीराजाच्या शेतीसाठी व जनावरां करीता वनराई बंधारा बांधला आहे.

टॅग्स :thaneठाणे