शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

जिल्ह्यातील शेतीसह जनावरांसाठी अधिकाऱ्यांकडून आता वनराई बंधाऱ्याची कामे!

By सुरेश लोखंडे | Updated: November 21, 2022 19:04 IST

‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली कामे

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली जिल्ह्यातील अधिकारी ग्रामीण, दुर्गम भागातील शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवत आहे. त्यांच्यासोबत राहून त्यांच्या समस्या एकूण घेण्यासह त्यांच्या विविध विषयावर हितगुज करीत असताना आता शेतीसाठी पाणी आडवण्याचे कामही अधिकारी करीत आहेत. यासाठी वाहत्या नदी, नाल्याचे पाणी वनराई बंधाऱ्याद्वारे अडवण्याचे काम सध्या केले जात आहे. यास अनुसरून भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील शिवारात अधिकाऱ्यांनी वनराई बंधारा घालून पाणी अडवले आहे.

शेतकऱ्यांसोबत एक दिवस राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना धीर देण्यासह शेतीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचे मार्गदर्शन ‘माझ्या बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली अधिकारी करीत आहेत. यासह आता वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर शेतीसाठी म्हणजे रब्बी पिकासाठी करता यावा, गायीगुरांसह जनावरांना उन्हाळ्यात पाणी मिळावे आदीसाठी अधिकाºयांकडून वनराईबंधारे बांधले जात आहे.

याप्रमाणे भिवंडी तालुक्यातील कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी मंडळ अधिकारी आर.ड. शिरसाट आदींसह क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची साप्ताहिक बैठक वापे येथील क्षेत्रावर घेतली . या आढावा बैठकीनंतर ‘एक दिवस बळीराज्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत सर्व कृषी सहाय्यक, अंबाडी व अनगांव येथील कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी अंबाडी येथील नदीवर वनराई बंधारा बांधला आहे.

अधिकाऱ्यांनी २५.५० मीटर लांब व एक मीटर उंचीचा बंधारा घातला आहे.  वनराई बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची २०५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर या क्षेत्रात तब्बल एकूण पाच टीसीएम पाणीसाठा तयार झाल्याचे सुतोवाच जिल्हा कृषी अधीक दिपक कुटे यांनी लोकमतला सांगितले. या बंधाऱ्यातील पाण्यामुळे तब्बल १५ हेक्टर शेती ओलीताखाली येणार असून त्यामुळे १२ शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होणार असल्याचे कुटे यांनी लक्षात आणून दिले. या वनराई बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना आता मिरची, भेंडी, मोगरा, आंबा आदी भाजीपाल्यासह फळबागांना वाढवणे शक्य होत आहे. या वनराई बंधाऱ्यांच्या कामात तालुका कृषी अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी कृषी पर्यवेक्षक संजय घुडे, बाळकृष्ण गायकवाड, गुरुनाथ शेलार, कृषी सहाय्यक विवेक दोंदे, नरेश बुजड, देवेंद्र गावंडा, हर्षल पाटील, स्नेहल वळंज, नूतन पाटील, अर्चना धलपे आदींनी श्रमदान करून बळीराजाच्या शेतीसाठी व जनावरां करीता वनराई बंधारा बांधला आहे.

टॅग्स :thaneठाणे