शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतीसह जनावरांसाठी अधिकाऱ्यांकडून आता वनराई बंधाऱ्याची कामे!

By सुरेश लोखंडे | Updated: November 21, 2022 19:04 IST

‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली कामे

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली जिल्ह्यातील अधिकारी ग्रामीण, दुर्गम भागातील शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवत आहे. त्यांच्यासोबत राहून त्यांच्या समस्या एकूण घेण्यासह त्यांच्या विविध विषयावर हितगुज करीत असताना आता शेतीसाठी पाणी आडवण्याचे कामही अधिकारी करीत आहेत. यासाठी वाहत्या नदी, नाल्याचे पाणी वनराई बंधाऱ्याद्वारे अडवण्याचे काम सध्या केले जात आहे. यास अनुसरून भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील शिवारात अधिकाऱ्यांनी वनराई बंधारा घालून पाणी अडवले आहे.

शेतकऱ्यांसोबत एक दिवस राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना धीर देण्यासह शेतीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचे मार्गदर्शन ‘माझ्या बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली अधिकारी करीत आहेत. यासह आता वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर शेतीसाठी म्हणजे रब्बी पिकासाठी करता यावा, गायीगुरांसह जनावरांना उन्हाळ्यात पाणी मिळावे आदीसाठी अधिकाºयांकडून वनराईबंधारे बांधले जात आहे.

याप्रमाणे भिवंडी तालुक्यातील कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी मंडळ अधिकारी आर.ड. शिरसाट आदींसह क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची साप्ताहिक बैठक वापे येथील क्षेत्रावर घेतली . या आढावा बैठकीनंतर ‘एक दिवस बळीराज्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत सर्व कृषी सहाय्यक, अंबाडी व अनगांव येथील कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी अंबाडी येथील नदीवर वनराई बंधारा बांधला आहे.

अधिकाऱ्यांनी २५.५० मीटर लांब व एक मीटर उंचीचा बंधारा घातला आहे.  वनराई बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची २०५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर या क्षेत्रात तब्बल एकूण पाच टीसीएम पाणीसाठा तयार झाल्याचे सुतोवाच जिल्हा कृषी अधीक दिपक कुटे यांनी लोकमतला सांगितले. या बंधाऱ्यातील पाण्यामुळे तब्बल १५ हेक्टर शेती ओलीताखाली येणार असून त्यामुळे १२ शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होणार असल्याचे कुटे यांनी लक्षात आणून दिले. या वनराई बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना आता मिरची, भेंडी, मोगरा, आंबा आदी भाजीपाल्यासह फळबागांना वाढवणे शक्य होत आहे. या वनराई बंधाऱ्यांच्या कामात तालुका कृषी अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी कृषी पर्यवेक्षक संजय घुडे, बाळकृष्ण गायकवाड, गुरुनाथ शेलार, कृषी सहाय्यक विवेक दोंदे, नरेश बुजड, देवेंद्र गावंडा, हर्षल पाटील, स्नेहल वळंज, नूतन पाटील, अर्चना धलपे आदींनी श्रमदान करून बळीराजाच्या शेतीसाठी व जनावरां करीता वनराई बंधारा बांधला आहे.

टॅग्स :thaneठाणे