शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु

By अजित मांडके | Updated: October 1, 2024 19:15 IST

या सर्व विद्यार्थ्यांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठाणे : कळवामधील मनिषा नगर भागातील सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळेतील इयत्ता पाचवी आणि सहावीत शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शासनाकडून देण्यात येणारे शालेय पोषण आहार या शाळेत देखील दिले जात होते. मंगळवारी दुपारी मनिषा नगर दत्तवाडी सहकार विद्या प्रसारक मंडळातील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यात भात, डाळ आणि मटकीच्या उसळी आदींचा समावेश होता. हे अन्न देत असतांनाच काही विद्यार्थ्यांना त्याच्या वासानेच मळमळल्यासारखे झाले. तर काहींनी अन्न खाल्यानंतर त्यांना उलटी, पोटदुखी आदींचा त्रास सुरु झाला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तत्काळ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले. 

हे अन्न खाल्याने ४० विद्यार्थ्यांना त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाने वर्तविला आहे. त्यातही शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या घराच्यांना सांयकाळच्या सुमारास याची माहिती दिल्याने विद्यार्थ्यांचे पालकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. विषबाधा झालेले विद्यार्थी हे इयत्ता पाचवी आणि सहावीत शिकणारे असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तर या पूर्वी देखील येथे देण्यात येणाऱ्या अन्नातून झुरळ, किडे आढळून आल्याचा दावा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे. 

तसेच पालकांना देखील ही माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. त्यातही शालेय पोषण आहार हे आधी शाळेच्या मुख्याध्यपकांनी खाणे अपेक्षित असतांना त्यांनी तसे न करता थेट विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयात दाखल झालेल्या ४० विद्यार्थ्यांवर रुग्णालय प्रशासनाकूडन उपचार सुरु असून अन्नातून विषबाधा झाल्यानेच त्यांना हा त्रास झाला असावा असा अंदाज असल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. तूर्तास सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा