शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

उमेदवारांचा छुप्या प्रचारावर भर, जबाबदाऱ्यांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:13 IST

ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारतोफा थंडावल्या असल्या, तरी उमेदवारांचा खरा प्रचार आता सुरू झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारतोफा थंडावल्या असल्या, तरी उमेदवारांचा खरा प्रचार आता सुरू झाला आहे. प्रमुख उमेदवारांच्या पक्षातील मंडळींनी जागता पहारा देत, छुप्या प्रचारावर भर दिला आहे. पक्ष कार्यालयांमध्ये बैठका, खलबतं सुरू आहेत. सोमवारी, मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर कसे काढता येईल, कोणी कोणती जबाबदारी घ्यायची, गाड्यांची व्यवस्था कशी करायची, यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्नही सुरू आहे.

ठाण्यासह कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीनिमित्त मागील १५ दिवस प्रचाराच्या फैरी झडताना दिसल्या आहेत. ठाणे लोकसभेत २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. परंतु, खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होणार आहे. मागील चार ते पाच दिवसांत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची, तर राष्टÑवादीकडून सुप्रिया सुळे यांचा मेळावा आणि जयंत पाटील, तसेच शरद पवार यांच्या सभा झाल्या. शनिवारी जयंत पाटील यांनी ठाण्यात तळ ठोकून निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. निवडणुकीचा पेपर कशा प्रकारे सोपा करता येईल, यासाठीची चाचपणी पदाधिकाऱ्यांकडून करून घेतल्याचे बोलले जात आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच विचारेंचा विजय अवलंबून असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात त्यांनी रथयात्रा, शनिवारी संपूर्ण ठाण्यात बाइक रॅली काढली होती. शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्याने, भरउन्हात होणारी कार्यकर्त्यांची भटकंती थांबली आहे. मात्र, आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. त्यासाठी ब्लॉक अध्यक्षापासून विभागीय अध्यक्षांपर्यंत सर्वांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पक्ष कार्यालयांमध्ये छुप्या बैठका सुरू आहेत. मतदारांना बाहेर कसे काढले जाईल, आपले मतदार कोणत्या भागात आहेत, कुठे नाहीत, याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व्हेद्वारे अभ्यास केला जात आहे.

निवडणुकीच्या प्रत्येक बुथवर लक्ष ठेवण्यासाठी आणि डोळ्यांत अंजन घालून काम करण्यासाठी जागता पहारा देण्याची तंबीच प्रत्येक बुथ कार्यकर्त्याला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, मतदाराला मतदानकेंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सुविधासुद्धा या मंडळींकडून करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक प्रभागातील पदाधिकाºयांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, मतदान कोणी केले, कोणी नाही, याकडे लक्ष देण्यासाठीही कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदारांनो सहलीवर नका जाऊ!ठाणे लोकसभा मतदारसंघातील २३ लाख ७० हजार २७६ मतदार आपला कौल कोणाला देणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील निवडणुकीत ५०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा त्यात भर पडणार की घट होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शनिवार, रविवार आणि मतदानाच्या दिवशी सोमवारी, अशी सलग तीन दिवस सुटी आल्याने आणि पुन्हा एक दिवस कामाचा भरल्यावर १ मे रोजी सुटी असल्याने, अनेकांनी या पाच दिवसांच्या सहलीचे नियोजन केले आहे. अशा मतदारांना रोखण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू आहे.

ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीबाबत काही शंका उपस्थित झाल्यास त्या तत्काळ निवडणूक विभागाला कळवण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी पदाधिकाºयांवर सोपवण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून जाणाऱ्या मतदानाच्या स्लिप घरोघरी पोहोचल्या आहेत किंवा नाही, याचीही चाचपणी केली जात आहे. शनिवारी सायंकाळपासून याबाबत विविध कार्यालयांमध्ये बैठका घेऊन याची वेळोवेळी माहिती घेतली जात असून रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे दिवसाची रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून काम करण्याचा मंत्र पदाधिकाऱ्यांना दिला जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकthane-pcठाणेkalyan-pcकल्याणbhiwandi-pcभिवंडी