शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

कल्याण तालुक्यातील पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:41 IST

कल्याण तहसीलदारांचे चाळी तलाठी पंचनाम्यात व्यस्त

उमेश जाधव, टिटवाळा-: कल्याण तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असून अनेकांच्या घरात पावसाच्या पूराचे  पाणी शिरल्याने हजारो लोकांच्या घरांचे व घालतील सामानाचे नुकसान झाले असून यात मोठ्या प्रमाणात वितरण हानी झाली आहे. 

राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. अशा प्रकारचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी सध्या कल्याण तालुक्याच्या पूरग्रस्त भागात पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्यासाठी फिरत आहेत. पुरात बाधीत झालेल्या लोकांशी संपर्क साधून माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात येत आहे. यावेळी बाधित पूरग्रस्तांना कडून रेशन कार्ड व त्यांचे बँक खाते नंबर यांचा पुरावा घेण्यात येत आहे. 

कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही आलेल्या पूरात नदीच्या काठावरील बाधित झालेल्या खडवली, जू, मांडा, टिटवाळा, रायते, कांबा, म्हारळ, वरप, आपटी, मांजर्ली, गेरसे या गावात सध्या शासकीय यंत्रणेकडून पंचनामे करण्याचे काम सूरू करण्यात आले आहे. 

हजारो लोकांना या पुराचा बसला असून, त्यामध्ये त्यांचे  प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे बुधवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी हा विषय लावून धरला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरात बाधीत झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी  १५ हजार रुपये व ज्या व्यक्तींचे वीज मीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असतील त्या व्यक्तीला नवीन मीटर बसवून देण्यात येईल याकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 

पूरग्रस्त भागात  जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्याचे काम शासकीय यंत्रणांनी प्रगतीपथावर सुरू केले आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन बाधीत पूरग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागात कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी पूरपरिस्थितीची पहाणी करण्यासाठी फिरत आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून आवाहल शासनाला सादर करण्यात येईल, असे कल्याणचे उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण