शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

कल्याण तालुक्यातील पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:41 IST

कल्याण तहसीलदारांचे चाळी तलाठी पंचनाम्यात व्यस्त

उमेश जाधव, टिटवाळा-: कल्याण तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असून अनेकांच्या घरात पावसाच्या पूराचे  पाणी शिरल्याने हजारो लोकांच्या घरांचे व घालतील सामानाचे नुकसान झाले असून यात मोठ्या प्रमाणात वितरण हानी झाली आहे. 

राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. अशा प्रकारचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी सध्या कल्याण तालुक्याच्या पूरग्रस्त भागात पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्यासाठी फिरत आहेत. पुरात बाधीत झालेल्या लोकांशी संपर्क साधून माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात येत आहे. यावेळी बाधित पूरग्रस्तांना कडून रेशन कार्ड व त्यांचे बँक खाते नंबर यांचा पुरावा घेण्यात येत आहे. 

कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही आलेल्या पूरात नदीच्या काठावरील बाधित झालेल्या खडवली, जू, मांडा, टिटवाळा, रायते, कांबा, म्हारळ, वरप, आपटी, मांजर्ली, गेरसे या गावात सध्या शासकीय यंत्रणेकडून पंचनामे करण्याचे काम सूरू करण्यात आले आहे. 

हजारो लोकांना या पुराचा बसला असून, त्यामध्ये त्यांचे  प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे बुधवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी हा विषय लावून धरला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरात बाधीत झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी  १५ हजार रुपये व ज्या व्यक्तींचे वीज मीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असतील त्या व्यक्तीला नवीन मीटर बसवून देण्यात येईल याकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 

पूरग्रस्त भागात  जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्याचे काम शासकीय यंत्रणांनी प्रगतीपथावर सुरू केले आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन बाधीत पूरग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागात कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी पूरपरिस्थितीची पहाणी करण्यासाठी फिरत आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून आवाहल शासनाला सादर करण्यात येईल, असे कल्याणचे उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण