शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कल्याण तालुक्यातील पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:41 IST

कल्याण तहसीलदारांचे चाळी तलाठी पंचनाम्यात व्यस्त

उमेश जाधव, टिटवाळा-: कल्याण तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असून अनेकांच्या घरात पावसाच्या पूराचे  पाणी शिरल्याने हजारो लोकांच्या घरांचे व घालतील सामानाचे नुकसान झाले असून यात मोठ्या प्रमाणात वितरण हानी झाली आहे. 

राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. अशा प्रकारचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी सध्या कल्याण तालुक्याच्या पूरग्रस्त भागात पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्यासाठी फिरत आहेत. पुरात बाधीत झालेल्या लोकांशी संपर्क साधून माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात येत आहे. यावेळी बाधित पूरग्रस्तांना कडून रेशन कार्ड व त्यांचे बँक खाते नंबर यांचा पुरावा घेण्यात येत आहे. 

कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही आलेल्या पूरात नदीच्या काठावरील बाधित झालेल्या खडवली, जू, मांडा, टिटवाळा, रायते, कांबा, म्हारळ, वरप, आपटी, मांजर्ली, गेरसे या गावात सध्या शासकीय यंत्रणेकडून पंचनामे करण्याचे काम सूरू करण्यात आले आहे. 

हजारो लोकांना या पुराचा बसला असून, त्यामध्ये त्यांचे  प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे बुधवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी हा विषय लावून धरला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरात बाधीत झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी  १५ हजार रुपये व ज्या व्यक्तींचे वीज मीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असतील त्या व्यक्तीला नवीन मीटर बसवून देण्यात येईल याकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 

पूरग्रस्त भागात  जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्याचे काम शासकीय यंत्रणांनी प्रगतीपथावर सुरू केले आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन बाधीत पूरग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागात कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी पूरपरिस्थितीची पहाणी करण्यासाठी फिरत आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून आवाहल शासनाला सादर करण्यात येईल, असे कल्याणचे उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण