शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 13:18 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे देशभक्तीचे प्रबोधन करण्यात आले. 

ठळक मुद्दे'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरणबालकलाकारांनी घेतला सहभाग

ठाणे : 'झेंडा हरवला आहे' म्हणजे देशात अनेक रंगांच्या झेंड्यामध्ये तिरंग्याचा रंग कुठेतरी हरवत चालला आहे त्याचा शोध.कलाकार म्हणून समाजाचे आपण काही देणं लागतो अशाच विचाराने अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक कलाकृतीतून समाजप्रबोधन करण्यात आले आहे.प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर परेश दळवी लिखीत आदित्य नाकती दिग्दर्शित 'झेंडा हरवला आहे' ही एकांकिका सादर करण्यात आली.

         भारत देशाचा इतिहास अभूतपूर्व आहे.अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे त्यागाचे प्रतीक आहे आपण अनुभवत असलेलं स्वातंत्र्य.परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळवल्यानंतर आजही आपण अनेक झेंड्याच्या नेतृत्वाखाली विखुरलेल्या अवस्थेत कुठेतरी मानसिक गुलामगिरीत घुसमटत जगत आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या तिरंग्याचे अस्तित्व विसरून गेलो आहोत. त्यातील रंग हे फक्त धार्मिक अर्थाने न घेता केशरी म्हणजे त्याग बलिदान पांढरा म्हणजे शांती,हिरवा म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहेत आणि निळे अशोक चक्र हे २४ तास प्रगतीशील राहण्यास प्रेरणा देणारे आहे ह्याचा विसर पडून आपण जणू आंधळेपणाने वावरत आहोत.अशाच देशातील अनेक झेंड्यामागे आंधळेपणाने धावणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि एका माजी सैनिकाची गोष्ट म्हणजे 'झेंडा हरवला आहे'..बाहेरील आतंकवादापेक्षा दिशाहीन तरुणपिढी अनेक रंगामध्ये विभागला जाऊन दंगली मोर्चे  अशा अंतर्गत आतंकवादाला कारणीभूत ठरतोय त्यांना खऱ्या झेंड्याची तिरंग्याची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'झेंडा हरवला आहे'.फक्त दोन दिवस देशभक्तीचा इव्हेंट करण्यापेक्षा रोज देशा साठी त्याग केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सैनिकांना पोलिसांना आठवून मनात एक कृतज्ञतेचा एक दिवा मनात लावून तो जपावं हा संदेश म्हणजे 'झेंडा हरवला आहे' एकांकिका.सदर एकांकिका सहदेव साळकर,ओमकार मराठे,महेश झिरपे,अमोघ डाके ह्या कलाकारांनी सादरीकरण केले.सदर सादरीकरणाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. यासोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी कदिर शेख दिग्दर्शित  'ये मेरे वतन के लोगो' आणि 'ये वतन वतन' ह्या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची कड ओलावली. सदर सादरीकरणात आदित्य नाकती,परेश दळवी,राजन मयेकर,शनि जाधव,धनेश चव्हाण,वैभव पवार,आतिश जगताप,संज्योत बावीसकर,उत्तम ठाकुर,शुभम कदम,कुंदन भोसले,रोहित सुतार,महेश झिरपे,सहदेव कोळंबकर,वैभव चव्हाण,न्युतन लंके,विजया साळुंके आणि रोहिणी थोरात  ह्या कलाकारांनी सहभाग घेतला.

      तसेच, महाराष्ट्रातील विविधतेतील एकता ह्या संकल्पनेवर आधारित परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरण अभिनय कट्ट्याच्या बालसंस्कार वर्गाच्या बालकलाकारांनी केले. सदर सादरीकरणात श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्ये,अमोघ डाके,अर्णय वाघ,अद्वैत मापगावकर,अस्मि शिंदे,पूर्वा तटकरे,वैष्णवी चेऊलकर,प्रथम नाईक,रुचिता भालेराव ह्या बालकलाकारांनी सहभाग घेतला. सदर कट्टा क्रमांक ४१३ चे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई