शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 13:18 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे देशभक्तीचे प्रबोधन करण्यात आले. 

ठळक मुद्दे'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरणबालकलाकारांनी घेतला सहभाग

ठाणे : 'झेंडा हरवला आहे' म्हणजे देशात अनेक रंगांच्या झेंड्यामध्ये तिरंग्याचा रंग कुठेतरी हरवत चालला आहे त्याचा शोध.कलाकार म्हणून समाजाचे आपण काही देणं लागतो अशाच विचाराने अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक कलाकृतीतून समाजप्रबोधन करण्यात आले आहे.प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर परेश दळवी लिखीत आदित्य नाकती दिग्दर्शित 'झेंडा हरवला आहे' ही एकांकिका सादर करण्यात आली.

         भारत देशाचा इतिहास अभूतपूर्व आहे.अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे त्यागाचे प्रतीक आहे आपण अनुभवत असलेलं स्वातंत्र्य.परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळवल्यानंतर आजही आपण अनेक झेंड्याच्या नेतृत्वाखाली विखुरलेल्या अवस्थेत कुठेतरी मानसिक गुलामगिरीत घुसमटत जगत आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या तिरंग्याचे अस्तित्व विसरून गेलो आहोत. त्यातील रंग हे फक्त धार्मिक अर्थाने न घेता केशरी म्हणजे त्याग बलिदान पांढरा म्हणजे शांती,हिरवा म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहेत आणि निळे अशोक चक्र हे २४ तास प्रगतीशील राहण्यास प्रेरणा देणारे आहे ह्याचा विसर पडून आपण जणू आंधळेपणाने वावरत आहोत.अशाच देशातील अनेक झेंड्यामागे आंधळेपणाने धावणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि एका माजी सैनिकाची गोष्ट म्हणजे 'झेंडा हरवला आहे'..बाहेरील आतंकवादापेक्षा दिशाहीन तरुणपिढी अनेक रंगामध्ये विभागला जाऊन दंगली मोर्चे  अशा अंतर्गत आतंकवादाला कारणीभूत ठरतोय त्यांना खऱ्या झेंड्याची तिरंग्याची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'झेंडा हरवला आहे'.फक्त दोन दिवस देशभक्तीचा इव्हेंट करण्यापेक्षा रोज देशा साठी त्याग केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सैनिकांना पोलिसांना आठवून मनात एक कृतज्ञतेचा एक दिवा मनात लावून तो जपावं हा संदेश म्हणजे 'झेंडा हरवला आहे' एकांकिका.सदर एकांकिका सहदेव साळकर,ओमकार मराठे,महेश झिरपे,अमोघ डाके ह्या कलाकारांनी सादरीकरण केले.सदर सादरीकरणाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. यासोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी कदिर शेख दिग्दर्शित  'ये मेरे वतन के लोगो' आणि 'ये वतन वतन' ह्या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची कड ओलावली. सदर सादरीकरणात आदित्य नाकती,परेश दळवी,राजन मयेकर,शनि जाधव,धनेश चव्हाण,वैभव पवार,आतिश जगताप,संज्योत बावीसकर,उत्तम ठाकुर,शुभम कदम,कुंदन भोसले,रोहित सुतार,महेश झिरपे,सहदेव कोळंबकर,वैभव चव्हाण,न्युतन लंके,विजया साळुंके आणि रोहिणी थोरात  ह्या कलाकारांनी सहभाग घेतला.

      तसेच, महाराष्ट्रातील विविधतेतील एकता ह्या संकल्पनेवर आधारित परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरण अभिनय कट्ट्याच्या बालसंस्कार वर्गाच्या बालकलाकारांनी केले. सदर सादरीकरणात श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्ये,अमोघ डाके,अर्णय वाघ,अद्वैत मापगावकर,अस्मि शिंदे,पूर्वा तटकरे,वैष्णवी चेऊलकर,प्रथम नाईक,रुचिता भालेराव ह्या बालकलाकारांनी सहभाग घेतला. सदर कट्टा क्रमांक ४१३ चे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई