शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 13:18 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे देशभक्तीचे प्रबोधन करण्यात आले. 

ठळक मुद्दे'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरणबालकलाकारांनी घेतला सहभाग

ठाणे : 'झेंडा हरवला आहे' म्हणजे देशात अनेक रंगांच्या झेंड्यामध्ये तिरंग्याचा रंग कुठेतरी हरवत चालला आहे त्याचा शोध.कलाकार म्हणून समाजाचे आपण काही देणं लागतो अशाच विचाराने अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक कलाकृतीतून समाजप्रबोधन करण्यात आले आहे.प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर परेश दळवी लिखीत आदित्य नाकती दिग्दर्शित 'झेंडा हरवला आहे' ही एकांकिका सादर करण्यात आली.

         भारत देशाचा इतिहास अभूतपूर्व आहे.अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे त्यागाचे प्रतीक आहे आपण अनुभवत असलेलं स्वातंत्र्य.परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळवल्यानंतर आजही आपण अनेक झेंड्याच्या नेतृत्वाखाली विखुरलेल्या अवस्थेत कुठेतरी मानसिक गुलामगिरीत घुसमटत जगत आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या तिरंग्याचे अस्तित्व विसरून गेलो आहोत. त्यातील रंग हे फक्त धार्मिक अर्थाने न घेता केशरी म्हणजे त्याग बलिदान पांढरा म्हणजे शांती,हिरवा म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहेत आणि निळे अशोक चक्र हे २४ तास प्रगतीशील राहण्यास प्रेरणा देणारे आहे ह्याचा विसर पडून आपण जणू आंधळेपणाने वावरत आहोत.अशाच देशातील अनेक झेंड्यामागे आंधळेपणाने धावणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि एका माजी सैनिकाची गोष्ट म्हणजे 'झेंडा हरवला आहे'..बाहेरील आतंकवादापेक्षा दिशाहीन तरुणपिढी अनेक रंगामध्ये विभागला जाऊन दंगली मोर्चे  अशा अंतर्गत आतंकवादाला कारणीभूत ठरतोय त्यांना खऱ्या झेंड्याची तिरंग्याची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'झेंडा हरवला आहे'.फक्त दोन दिवस देशभक्तीचा इव्हेंट करण्यापेक्षा रोज देशा साठी त्याग केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सैनिकांना पोलिसांना आठवून मनात एक कृतज्ञतेचा एक दिवा मनात लावून तो जपावं हा संदेश म्हणजे 'झेंडा हरवला आहे' एकांकिका.सदर एकांकिका सहदेव साळकर,ओमकार मराठे,महेश झिरपे,अमोघ डाके ह्या कलाकारांनी सादरीकरण केले.सदर सादरीकरणाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. यासोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी कदिर शेख दिग्दर्शित  'ये मेरे वतन के लोगो' आणि 'ये वतन वतन' ह्या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची कड ओलावली. सदर सादरीकरणात आदित्य नाकती,परेश दळवी,राजन मयेकर,शनि जाधव,धनेश चव्हाण,वैभव पवार,आतिश जगताप,संज्योत बावीसकर,उत्तम ठाकुर,शुभम कदम,कुंदन भोसले,रोहित सुतार,महेश झिरपे,सहदेव कोळंबकर,वैभव चव्हाण,न्युतन लंके,विजया साळुंके आणि रोहिणी थोरात  ह्या कलाकारांनी सहभाग घेतला.

      तसेच, महाराष्ट्रातील विविधतेतील एकता ह्या संकल्पनेवर आधारित परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरण अभिनय कट्ट्याच्या बालसंस्कार वर्गाच्या बालकलाकारांनी केले. सदर सादरीकरणात श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्ये,अमोघ डाके,अर्णय वाघ,अद्वैत मापगावकर,अस्मि शिंदे,पूर्वा तटकरे,वैष्णवी चेऊलकर,प्रथम नाईक,रुचिता भालेराव ह्या बालकलाकारांनी सहभाग घेतला. सदर कट्टा क्रमांक ४१३ चे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई