शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

तक्रारींचे निराकरण जलदगतीने करा!, आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:58 IST

विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिका-यांना दिले.

कल्याण : विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिकाºयांना दिले. ई गव्हर्नन्स विभागाचे कामकाज सक्षम करण्याच्या दृष्टीने या विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातही सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी सूचना केल्या.महापालिकेत दर सोमवारी होणाºया साप्ताहिक आढावा बैठकीत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेतला जातो. या बैठकीत वेलरासू यांनी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने केलेल्या नियोजनाचा आढावाही घेतला. त्यात त्यांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून घेतली.विसर्जनासाठी महापालिकने कल्याण व डोंबिवली येथे कृत्रीम तलाव तयार केलेले आहेत. या तलावांमध्ये दीड दिवसाच्या पाच हजार ११४ मूर्तींचे विसर्जन शनिवारी झाले. महापालिकेने गणेशोत्सवात होणारे प्रदूषण टाळण्यावर अधिक भर दिला आहे.त्यापार्श्वभूमीवर भाविकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन वेलरासू यांनी या वेळी केले. त्यानंतर प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना प्रभागा अंतर्गत स्वच्छता ठेवणे, शहरातील बॅनर-होर्डिंग काढणे, याशिवाय नागरिकांकडून प्राप्त तक्र ारींचे निराकरण जलदगतीने करण्याच्या सूचना वेलरासू यांनी दिल्या.सिस्टीम मॅनेजर आणि अ‍ॅनालिस्टपदे भरणारई गर्व्हनन्सप्रणाली राबवणारी केडीएमसी ही राज्यातील महापालिका आहे. सध्या हीच प्रणाली राज्यातील अन्य नगरपालिका, महापालिकांमध्ये राबवली जात आहे.मात्र, आतापर्यंत केडीएमसीचा कारभार कितपत पेपरलेस झाला? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. असे असताना येथील ई गर्व्हनन्स विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्याचा निर्णय वेलरासू यांनी घेतला आहे. या विभागातील सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम अ‍ॅनालिस्टही प्रभारी पदे कायमस्वरूपी तातडीने भरण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.केडीएमटीचेउत्पन्न वाढवा!परिवहन विभागातील कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त वेलरासू यांनी परिवहन महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना परिवहन सेवा सक्षम करण्याचे आदेश दिले. ज्यामार्गावर जास्त प्रवासी आहेत, अशा मार्गांवर जादा बस गाड्या सोडाव्यात, प्रवाशांनाजास्तीत जास्त दिलासा कसा मिळेल, याचे नियोजन करावे,अशा सूचना दिल्या. आवश्यकत्या भासल्यास नवीन बसवरचालक-वाहक यांची संख्या वाढवून, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्यत्न करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले आहेत.