शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

तक्रारींचे निराकरण जलदगतीने करा!, आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:58 IST

विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिका-यांना दिले.

कल्याण : विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिकाºयांना दिले. ई गव्हर्नन्स विभागाचे कामकाज सक्षम करण्याच्या दृष्टीने या विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातही सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी सूचना केल्या.महापालिकेत दर सोमवारी होणाºया साप्ताहिक आढावा बैठकीत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेतला जातो. या बैठकीत वेलरासू यांनी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने केलेल्या नियोजनाचा आढावाही घेतला. त्यात त्यांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून घेतली.विसर्जनासाठी महापालिकने कल्याण व डोंबिवली येथे कृत्रीम तलाव तयार केलेले आहेत. या तलावांमध्ये दीड दिवसाच्या पाच हजार ११४ मूर्तींचे विसर्जन शनिवारी झाले. महापालिकेने गणेशोत्सवात होणारे प्रदूषण टाळण्यावर अधिक भर दिला आहे.त्यापार्श्वभूमीवर भाविकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन वेलरासू यांनी या वेळी केले. त्यानंतर प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना प्रभागा अंतर्गत स्वच्छता ठेवणे, शहरातील बॅनर-होर्डिंग काढणे, याशिवाय नागरिकांकडून प्राप्त तक्र ारींचे निराकरण जलदगतीने करण्याच्या सूचना वेलरासू यांनी दिल्या.सिस्टीम मॅनेजर आणि अ‍ॅनालिस्टपदे भरणारई गर्व्हनन्सप्रणाली राबवणारी केडीएमसी ही राज्यातील महापालिका आहे. सध्या हीच प्रणाली राज्यातील अन्य नगरपालिका, महापालिकांमध्ये राबवली जात आहे.मात्र, आतापर्यंत केडीएमसीचा कारभार कितपत पेपरलेस झाला? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. असे असताना येथील ई गर्व्हनन्स विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्याचा निर्णय वेलरासू यांनी घेतला आहे. या विभागातील सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम अ‍ॅनालिस्टही प्रभारी पदे कायमस्वरूपी तातडीने भरण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.केडीएमटीचेउत्पन्न वाढवा!परिवहन विभागातील कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त वेलरासू यांनी परिवहन महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना परिवहन सेवा सक्षम करण्याचे आदेश दिले. ज्यामार्गावर जास्त प्रवासी आहेत, अशा मार्गांवर जादा बस गाड्या सोडाव्यात, प्रवाशांनाजास्तीत जास्त दिलासा कसा मिळेल, याचे नियोजन करावे,अशा सूचना दिल्या. आवश्यकत्या भासल्यास नवीन बसवरचालक-वाहक यांची संख्या वाढवून, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्यत्न करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले आहेत.