शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

तक्रारींचे निराकरण जलदगतीने करा!, आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:58 IST

विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिका-यांना दिले.

कल्याण : विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिकाºयांना दिले. ई गव्हर्नन्स विभागाचे कामकाज सक्षम करण्याच्या दृष्टीने या विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातही सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी सूचना केल्या.महापालिकेत दर सोमवारी होणाºया साप्ताहिक आढावा बैठकीत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेतला जातो. या बैठकीत वेलरासू यांनी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने केलेल्या नियोजनाचा आढावाही घेतला. त्यात त्यांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून घेतली.विसर्जनासाठी महापालिकने कल्याण व डोंबिवली येथे कृत्रीम तलाव तयार केलेले आहेत. या तलावांमध्ये दीड दिवसाच्या पाच हजार ११४ मूर्तींचे विसर्जन शनिवारी झाले. महापालिकेने गणेशोत्सवात होणारे प्रदूषण टाळण्यावर अधिक भर दिला आहे.त्यापार्श्वभूमीवर भाविकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन वेलरासू यांनी या वेळी केले. त्यानंतर प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना प्रभागा अंतर्गत स्वच्छता ठेवणे, शहरातील बॅनर-होर्डिंग काढणे, याशिवाय नागरिकांकडून प्राप्त तक्र ारींचे निराकरण जलदगतीने करण्याच्या सूचना वेलरासू यांनी दिल्या.सिस्टीम मॅनेजर आणि अ‍ॅनालिस्टपदे भरणारई गर्व्हनन्सप्रणाली राबवणारी केडीएमसी ही राज्यातील महापालिका आहे. सध्या हीच प्रणाली राज्यातील अन्य नगरपालिका, महापालिकांमध्ये राबवली जात आहे.मात्र, आतापर्यंत केडीएमसीचा कारभार कितपत पेपरलेस झाला? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. असे असताना येथील ई गर्व्हनन्स विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्याचा निर्णय वेलरासू यांनी घेतला आहे. या विभागातील सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम अ‍ॅनालिस्टही प्रभारी पदे कायमस्वरूपी तातडीने भरण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.केडीएमटीचेउत्पन्न वाढवा!परिवहन विभागातील कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त वेलरासू यांनी परिवहन महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना परिवहन सेवा सक्षम करण्याचे आदेश दिले. ज्यामार्गावर जास्त प्रवासी आहेत, अशा मार्गांवर जादा बस गाड्या सोडाव्यात, प्रवाशांनाजास्तीत जास्त दिलासा कसा मिळेल, याचे नियोजन करावे,अशा सूचना दिल्या. आवश्यकत्या भासल्यास नवीन बसवरचालक-वाहक यांची संख्या वाढवून, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्यत्न करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले आहेत.