शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

उल्हासनगरमध्ये रोज पाच हजार प्रवाशांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाला बंदी असतानाही लोकलमध्ये गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाला बंदी असतानाही लोकलमध्ये गर्दी कशी होते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. उल्हासनगर स्थानकातून रोज ५ हजार ५००, तर महिन्याला ६५ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची नोंद स्टेशन डायरीमध्ये आहे.

उल्हासनगर हद्द अंतर्गत शहाड, विठ्ठलवाडी व उल्हासनगर असे तीन रेल्वे स्टेशन असून, कोरोना महामारीपूर्वी तिन्ही स्टेशनमधून हजारो नागरिक ये-जा करीत असल्याची नोंद आहे. मात्र, कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून येण्याजाण्याची परवानगी सरकारने दिली. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकही लोकलमधून प्रवास करीत असल्याची चर्चा आहे. सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवशी लोकलमध्ये गर्दी असल्याने, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उल्हासनगर स्टेशनमधून महिन्याला ६५ हजार, तर दररोज सरासरी ५५०० नागरिक लोकलने प्रवास करीत असून, यापूर्वी हीच संख्या दरमहा अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक मनोहर पाटील यांनी दिली.

स्टेशनमध्ये लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडे जेव्हा तिकीट तपासणीस तिकिटाची विचारणा करतात तेव्हा अनेकांकडे तिकीट नसल्याचे उघड झाले. यातूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच स्टेशनच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे उघड झाले, तर अनेकजण स्वतःची नोकरी वाचविण्यासाठी व लोकल व्यतिरिक्त दुसरा प्रवास खर्च परवडणार नसल्याने, रोज विनातिकीट प्रवास करीत आहेत. महिन्याला दोन-तीन वेळा तिकीट तपासणी दरम्यान पकडले जाण्याची भीती असते. मात्र, दुसरा याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विनातिकीट पकडल्यास २५० ते ७५० दरम्यान तिकिटांचा दंड भरावा लागतो, अशी माहिती चाकरमान्यांपैकी अनेकांनी दिली. मात्र, नाव उघड होईल, या भीतीपोटी नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती त्यांनी केली, तर तिकीट तपासनीस यांनी कारवाई केलेली माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दररोज दिली जात असून, याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्या असे सांगितले.

-------------------

हेतर आमच्यासाठी देवदूत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, मुंबईसह इतर ठिकाणी आजारी नातेवाईक व जवळील रुग्णाच्या मदतीला जावे लागते. त्यासाठी लोकल प्रवासाव्यतिरिक्त दुसरा प्रवास खर्च परवडणारा नसतो. अशावेळी संबंधित नातेवाईक व त्यांचे रुग्णालयाचे कागदपत्र दाखविल्यास लोकलचे तिकीट दिले जाते. त्यावेळी हेच खरे आमच्यासाठी देवदूत असतात, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.