शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

उल्हासनगरमध्ये रोज पाच हजार प्रवाशांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाला बंदी असतानाही लोकलमध्ये गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाला बंदी असतानाही लोकलमध्ये गर्दी कशी होते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. उल्हासनगर स्थानकातून रोज ५ हजार ५००, तर महिन्याला ६५ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची नोंद स्टेशन डायरीमध्ये आहे.

उल्हासनगर हद्द अंतर्गत शहाड, विठ्ठलवाडी व उल्हासनगर असे तीन रेल्वे स्टेशन असून, कोरोना महामारीपूर्वी तिन्ही स्टेशनमधून हजारो नागरिक ये-जा करीत असल्याची नोंद आहे. मात्र, कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून येण्याजाण्याची परवानगी सरकारने दिली. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकही लोकलमधून प्रवास करीत असल्याची चर्चा आहे. सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवशी लोकलमध्ये गर्दी असल्याने, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उल्हासनगर स्टेशनमधून महिन्याला ६५ हजार, तर दररोज सरासरी ५५०० नागरिक लोकलने प्रवास करीत असून, यापूर्वी हीच संख्या दरमहा अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक मनोहर पाटील यांनी दिली.

स्टेशनमध्ये लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडे जेव्हा तिकीट तपासणीस तिकिटाची विचारणा करतात तेव्हा अनेकांकडे तिकीट नसल्याचे उघड झाले. यातूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच स्टेशनच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे उघड झाले, तर अनेकजण स्वतःची नोकरी वाचविण्यासाठी व लोकल व्यतिरिक्त दुसरा प्रवास खर्च परवडणार नसल्याने, रोज विनातिकीट प्रवास करीत आहेत. महिन्याला दोन-तीन वेळा तिकीट तपासणी दरम्यान पकडले जाण्याची भीती असते. मात्र, दुसरा याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विनातिकीट पकडल्यास २५० ते ७५० दरम्यान तिकिटांचा दंड भरावा लागतो, अशी माहिती चाकरमान्यांपैकी अनेकांनी दिली. मात्र, नाव उघड होईल, या भीतीपोटी नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती त्यांनी केली, तर तिकीट तपासनीस यांनी कारवाई केलेली माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दररोज दिली जात असून, याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्या असे सांगितले.

-------------------

हेतर आमच्यासाठी देवदूत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, मुंबईसह इतर ठिकाणी आजारी नातेवाईक व जवळील रुग्णाच्या मदतीला जावे लागते. त्यासाठी लोकल प्रवासाव्यतिरिक्त दुसरा प्रवास खर्च परवडणारा नसतो. अशावेळी संबंधित नातेवाईक व त्यांचे रुग्णालयाचे कागदपत्र दाखविल्यास लोकलचे तिकीट दिले जाते. त्यावेळी हेच खरे आमच्यासाठी देवदूत असतात, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.