शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

दिव्यातील पाच हजार घरे दोन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 04:00 IST

ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवागावाला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यात आता विजेच्या लपंडावाची भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील साबेगावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवागावाला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यात आता विजेच्या लपंडावाची भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील साबेगावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो अद्यापही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे येथील सुमारे पाच हजार घरे अंधारात आहेत. दोन दिवस उलटून गेल्यानंतर महावितरणने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.दिवागावात मागील काही दिवसांपासून स्मशानभूमीचा मुद्दा चांगलाच गाजत होता. आता तो बाजूला जात नाही, तोच विजेच्या मुद्याने डोके वर काढले आहे. या भागातील साबेगावातील वीजपुरवठा मागील दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे गाव संपूर्णपणे अंधारात आहे. याबाबत, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाºयांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही त्यावर महावितरणने योग्य तो तोडगा काढलेला नाही. केवळ या भागाचाच नाही, तर मागील आठवडाभरापासून साबेगावासह दातिवली, दिवा पश्चिम, मुंब्रादेवी कॉलनी आदींसह इतर भागांतही विजेचा लपंडाव सुरूआहे. कधी एक दिवस, तर कधी दोन दिवसांआड या भागातील वीज खंडित होत आहे.लोकसंख्यावाढीमुळे ट्रान्सफॉर्मरवर लोडया भागाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे विजेच्या ट्रान्सफॉर्मरवरील लोडसुद्धा वाढत आहे. परंतु, त्याची क्षमता वाढवण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच आम्हाला विजेच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले. शिवाय, महावितरणच्या संबंधित अधिकाºयांकडे याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाइल बंद अवस्थेत असतो. सुरूअसला तरी योग्य प्रतिसाद मिळत नाही.कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता, त्याठिकाणीदेखील ते हजरच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे या भागात आकडे टाकणे, चोरून वीज वापरणे याचे प्रमाण अधिक असल्याने ट्रान्सफॉर्मर त्याचा लोड घेत नसल्याने वीजपुरवठा खंडित असल्याचे मत महावितरणने व्यक्त केले आहे.वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्याविरोधात महावितरणला निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, शुक्रवारपर्यंत तो सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.- निलेश पाटील, अध्यक्ष,भाजपा, दिवा मंडलदोन तासांत ट्रान्सफॉर्मर बसवला जाणार असून सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. ए.आर. राठोड - महावितरण अधिकारी, दिवा-शीळ विभाग

टॅग्स :Power Shutdownभारनियमन