शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दिव्यातील पाच हजार घरे दोन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 04:00 IST

ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवागावाला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यात आता विजेच्या लपंडावाची भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील साबेगावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवागावाला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यात आता विजेच्या लपंडावाची भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील साबेगावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो अद्यापही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे येथील सुमारे पाच हजार घरे अंधारात आहेत. दोन दिवस उलटून गेल्यानंतर महावितरणने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.दिवागावात मागील काही दिवसांपासून स्मशानभूमीचा मुद्दा चांगलाच गाजत होता. आता तो बाजूला जात नाही, तोच विजेच्या मुद्याने डोके वर काढले आहे. या भागातील साबेगावातील वीजपुरवठा मागील दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे गाव संपूर्णपणे अंधारात आहे. याबाबत, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाºयांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही त्यावर महावितरणने योग्य तो तोडगा काढलेला नाही. केवळ या भागाचाच नाही, तर मागील आठवडाभरापासून साबेगावासह दातिवली, दिवा पश्चिम, मुंब्रादेवी कॉलनी आदींसह इतर भागांतही विजेचा लपंडाव सुरूआहे. कधी एक दिवस, तर कधी दोन दिवसांआड या भागातील वीज खंडित होत आहे.लोकसंख्यावाढीमुळे ट्रान्सफॉर्मरवर लोडया भागाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे विजेच्या ट्रान्सफॉर्मरवरील लोडसुद्धा वाढत आहे. परंतु, त्याची क्षमता वाढवण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच आम्हाला विजेच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले. शिवाय, महावितरणच्या संबंधित अधिकाºयांकडे याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाइल बंद अवस्थेत असतो. सुरूअसला तरी योग्य प्रतिसाद मिळत नाही.कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता, त्याठिकाणीदेखील ते हजरच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे या भागात आकडे टाकणे, चोरून वीज वापरणे याचे प्रमाण अधिक असल्याने ट्रान्सफॉर्मर त्याचा लोड घेत नसल्याने वीजपुरवठा खंडित असल्याचे मत महावितरणने व्यक्त केले आहे.वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्याविरोधात महावितरणला निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, शुक्रवारपर्यंत तो सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.- निलेश पाटील, अध्यक्ष,भाजपा, दिवा मंडलदोन तासांत ट्रान्सफॉर्मर बसवला जाणार असून सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. ए.आर. राठोड - महावितरण अधिकारी, दिवा-शीळ विभाग

टॅग्स :Power Shutdownभारनियमन