शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एसटीच्या वातानुकुलीत पाच शिवशाही बसेस अखेर ठाण्यात दाखल

By सुरेश लोखंडे | Updated: January 20, 2018 17:32 IST

ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेत

ठळक मुद्देलोकमत इंम्पॅक्ट एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेतघोडबंदर परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवशाहीच्या या वातानुकुलित बसेस सुमारे २० मिनीटाच्या अंतराने ठाणेहून बोरिवली सोडल्या जाणार

* कोल्हापूरसाठी धावणाºया बसेसला उत्तम प्रतिसाद* सोमवारपासून ठाणे-बोरिवलीसाठी तीन बसेसठाणे : राज्यातील महत्वाच्या शहरांना जवळ करण्यासाठी मागील सुमारे दीड महिन्यांपासून ठिकठिकाणी धावणा-या वातानुकुलित शिवशाही बसेस अखेर ठाणेकरांच्या सेवेसाठी देखील दाखल झाल्या आहेत. पाच बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. यातील दोन बसेस कोल्हापूरसाठी आधीच धावत असून उर्वरित तीन बसेस ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोमवारपासून सोडल्या जाणार आहेत.‘नूतन वर्षात शिवशाही ठाण्यात होणार दाखल’ या मथळ्याखाली लोकमतने २७ डिसेंबररोजी वृत्तप्रसिध्द करून चोखंदळ ठाणेकरांना आधीच सुखद धक्का दिला होता. यानुसार एसटी महामंडळाच्या ठाणे बस आगारसाठी सुमारे १२ ‘शिवशाही’ या वातानुकुलित बसेस मंजूर झाल्या आहेत. सुमारे ५५ सिटरच्या या बसेसपैकी एक बस आधीच कोल्हापूरसाठी एक महिन्यापासून धावत आहेत. आता सध्या पाच बसेस ठाण्यात दाखल आहेत. त्यातील दोन बसेस पुन्हा कोल्हापूरसाठी सुमारे २० दिवसांपासून धावत आहेत. आता उर्वरित तीन बसेस ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. घोडबंदर परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवशाहीच्या या वातानुकुलित बसेस सुमारे २० मिनीटाच्या अंतराने ठाणेहून बोरिवली सोडल्या जाणार आहेत. या मार्गावर दिवसभराच्या कालावधीत सुमारे ११८ फे-या या बसेस करणार आहेत.ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेत. या खाजगी कंपन्यांच्या चालकाना सतत कर्तव्यावर राहावे लागत असल्यामुळे त्यांना आराम मिळत नाही. त्यांची झोप होत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सुमारे १५ दिवसांपूर्वी लोनावळा येथे गाडी बाजूला लावून झोप घेतली आणि त्यानंतर तो कोल्हापूरच्या वाटेला लागल्याचे वृत्त आहे. मात्र अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही, पण काही लोक नाहक चुकीची माहिती पसरवित आहे. या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुतोवाच ठाणे एसटी महामंडळाचे डीसी अविनाश पाटील यांनी लोकमतला सांगितले...........कृपया लोकमत इंम्पॅक्ट लोगो वापरावा

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार