शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

तरुणाची हत्या करणाऱ्या पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 02:40 IST

मुलीचे प्रेमसंबंध अमान्य असलेल्या मुलुंडमधील राजेंद्र प्रसाद तिवारी या पित्याने तिचा प्रियकर सुरेंद्र मिश्रा (२६, रा. दिवा) याचे नियोजनबद्ध अपहरण करून त्याला धावत्या लोकलमधून फेकून देऊन हत्या केल्याचा गुन्हा ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणून पाच जणांना अटक केली.

ठाणे : मुलीचे प्रेमसंबंध अमान्य असलेल्या मुलुंडमधील राजेंद्र प्रसाद तिवारी या पित्याने तिचा प्रियकर सुरेंद्र मिश्रा (२६, रा. दिवा) याचे नियोजनबद्ध अपहरण करून त्याला धावत्या लोकलमधून फेकून देऊन हत्या केल्याचा गुन्हा ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणून पाच जणांना अटक केली. याप्रकरणी तरुणाचे अपहरण झाल्याचा गुन्हा जुलै महिन्यात नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल होता. रेल्वे अपघातात बेवारस म्हणून नोंद असलेल्या त्या तरुणाचे पार्थिव कुटुंबाच्या हाती लागण्यापूर्वीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याचा फोटो आणि काही वस्तूंवरून त्याची ओळख पटवल्याचे पोलिसांनी सांगितले.मूळ उत्तर प्रदेशचा असलेला मयत सुरेंद्र मिश्रा (२६) हा दिव्यात राहत होता. त्याचे मुलुंड येथे राहणारे मुख्य आरोपी राजेंद्र तिवारी यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. ते आरोपीला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने चार साथीदारांना हाताशी धरून नियोजनबद्ध कट रचून सुरेंद्र याला रूम दाखवतो, असे सांगून ठाण्यात बोलवले. त्यानंतर, त्याचे अपहरण क रून त्यास मुलुंड येथे नेऊन हात बांधून मारहाण केली. तसेच त्याला गावी जाण्यास सांगून कल्याण येथे सोडण्याच्या बहाण्याने मुलुंड येथून कसारा लोकलच्या लगेज डब्यामध्ये ते बसले. नंतर, वासिंद आणि आसनगाव स्टेशनदरम्यान जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याला लोकलमधून खाली फेकून दिले. तसेच मुख्य आरोपी तिवारी हा दुबई येथे निघून गेला होता. याचदरम्यान, मिश्रा याच्या अपहरणाचा तपास ठाणे गुन्हे आणि नौपाडा पोलीस करत असताना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार भास्कर नारायण नारंगीकर आणि रवी अशोक चौधरी या दोघांना वेगवेगळ्या दिवशी अटक केली.