शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

राज्यस्तरीय आंबडेकरी साहित्य संमेलनात मांडले गेले पाच महत्वाचे ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 20:14 IST

मुंबईतील इंदू मिलच्या नियोजित जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे केले जाणार आहे. निवडणूका आल्या की, मते मिळविण्यासाठी केवळ दोन विटा रचल्या जातात. पुढे त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करावे असा ठराव आज पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आला आहे. 

कल्याण : मुंबईतील इंदू मिलच्या नियोजित जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे केले जाणार आहे. निवडणुका आल्या की, मते मिळविण्यासाठी केवळ दोन विटा रचल्या जातात. पुढे त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करावे असा ठराव आज पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आला आहे.     अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे ठाणे जिल्हा शाखा आणि नालंदा बुध्द विहार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबडेकर साहित्य संमेलन मोहोने येथे आयोजित करण्यात आले होते. एक दिवसीय साहित्य संमेलनानिमित्त सकाळीच भव्य संमेलन यात्रा काढण्यात आली. त्यानंतर संमेलन उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यास मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थित पार पडला. संमेलनाच्या दुपारच्या सत्रत आंबेडकरी कवींचे काव्यवाचन कवीमंच नामदेव ढसाळ मंचावर पार पडले. समारोपास येणा-या मान्यवरांनी संमेलनाच्या समारोपाकडे पाठ फिरवल्याने आहे. त्या मान्यवरांच्या उपस्थित समारोपाचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. जयप्रकाश घुमटकर यांनी या संमेलनात महत्वपूर्ण पाच ठराव मांडले त्याला मंजूरी दिली. हे पाच ठराव मुख्यमंत्र्यांकडेही पाठविले जाणार आहे. त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. त्यापैकी इंदू मिलच्या नियोजीत जागेत आंबडेकरांचे भव्य स्मारक उभारण्यात दिरंगाई होत आहे. हे स्मारक तातडीने लवकरात लवकर उभारले जावे, असा पहिला ठराव मांडण्यात आला. ज्या मोहने नगरीत हे संमेलन आयोजित केले गेले.  ज्या मोहने नगरीत हे संमेलन आयोजित केले गेले. त्या मोहनेतील एनआरसी कंपनी 2009 सालापासून बंद आहे. मालकाने कामगारांना थकीत देणी दिलेली नाही. कामगार देशोधडीस लागले आहेत. तीन हजार कामगारांना थकीन देणी मिळालेली नाही. कंपनी सुरु झाली नाही झाली तरी कामगारांना त्यांची थकीत देणी देण्यात यावी असा दुसरा ठराव करण्यात आला. राज्य सरकारने शेतक-यांना कजर्माफी व्याजासकट द्यावी. तसेच त्यांचे सातबारे कोरे करावे असा ठराव मांडण्यात आला. हा तिसरा ठराव होता. पालघर तालुक्यात ऑनलाईनवर 150 रुपये भरुन अर्ज भरून घेतला गेला. त्या शेतक-याला 15 रुपये कजर्माफी देण्यात आली. त्याचा अर्जाचा खर्च जास्त होता. या मुद्याकडे घुमटकर यांनी लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यात राज्य सरकारने लक्ष घालून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. त्यांचे भवितव्य वाया जाता कामा नये. हा चौथा ठराव होता. पाचव्या ठरावानुसार मोहने येथे रुग्णालयासाठी जागा देण्यात आली आहे. सामान्यांसाठी रुग्णालय उभारण्यात यावे. हा ठराव मांडला गेला. संमेलनाच्या विचारपीठावरुन मांडलेल्या ठरावापैकी आंबडेकर स्मारकाचा ठराव हा देशपातळीशी संबंधित होता. तर शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा हा राज्य पातळीवरील होता. विद्यापीठाचा मुद्दा हा मुंबई व कोकण प्रातांपूरता होता. अन्य दोन विषय हे कामगार व आरोग्यांच्या प्रश्नाची निगडीत होते. त्यामुळे मांडलेले सगळे ठराव हे जनहिताचे आणि तळागाळीतील सामान्यांच्या प्रश्नाशी निगडीत होते. संमेलनाच्या व्यासपीठावर केवळ ठराव मांडून ते मंजूर केलेले नसून विचाराची बांधिलकी जपणार असल्याने त्याचा पाठपुरावाही सातत्याने केला जाईल असे घुमटकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे