शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कल्याण तालुक्यात पाच सक्षम रस्त्यांचे जाळे

By admin | Updated: September 8, 2016 02:25 IST

मुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा

मुरलीधर भवार, कल्याणमुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाणार आहे. रस्ते विकास व सुनियोजित शहर विकास प्रकल्पामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात टिटवाळा, गोवेली, खडवली ही ठिकाणे विकासाचे केंद्रविंदू ठरणार आहेत. कल्याण-मुरबाड रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी जवळपास ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाची निविदा भूसंपादनाच्या प्रक्रियेनंतर काढली जाणार आहे. कल्याण ते टोकावडेपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्यात असलेल्या नदीवरील पुलांचेही चौपदीकरण करून ते नव्याने विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे कल्याण-माळशेज मार्गावरील कोंडी दूर होईल. हा रस्ता टोल फ्री असेल. एमएमआरडीएतर्फे शिरसाट फाटा ते उरण रस्ता दुपदरी केला जाणार आहे. हा रस्ता खडवली, गोविली, बदलापूरमार्गे उरणला जोडला जाईल. या रस्त्यावरील भातसा नदीवर खडवली येथील पूल, काळू नदीवरील टिटवाळा येथील पूल आणि उल्हास नदीवरील आपटी येथील पूलही रुंद केले जातील. वडदोरा ते उरणदरम्यान जवळपास ७०० कोटी खर्चून नव्याने सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा रस्ता मानिवली, गोवेली, रायते, आणे, भिसोळ, घोटसई या मार्गे उरणला जोडला जाईल. परंतु, वांगणीनजीक सह्याद्रीच्या फूटहिल्स असलेल्या डोंगराला बोगदा पाडून हा रस्ता उरणकडे मार्गस्त होईल. या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येईल. मुंबई-नागपूरदरम्यान नवीन सहा पदरी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. सरकारचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. चिंचवली येथे या रस्त्याचे आउटलेट आहे. याच रस्त्यावर एक हजार एकर जमीन संपादित करून तेथे नवी औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यास सुनियोजित शहराचा दर्जा दिला जाणार आहे. हा विकास सिडकोच्या धर्तीवर केला जाईल. त्यामुळे फळेगाव उतणे, नडगाव, दानगाव, चिंचवली, राया, उशीद या गावांचा परिसराचा कायापालट होणार आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाईल.शहापूर ते कर्जत चौपदरी रस्त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. हा रस्ता टोलफ्री असेल. या रस्त्यामुळे नाशिक मार्गावरील वाहतूक पुणेमार्गे वळवली जाईल. शहापूर व मुरबाडमधील प्रवासी व मालवाहतूकदारांना कल्याणला वळसा घालावा लागणार नाही.