शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यात पाच सक्षम रस्त्यांचे जाळे

By admin | Updated: September 8, 2016 02:25 IST

मुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा

मुरलीधर भवार, कल्याणमुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाणार आहे. रस्ते विकास व सुनियोजित शहर विकास प्रकल्पामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात टिटवाळा, गोवेली, खडवली ही ठिकाणे विकासाचे केंद्रविंदू ठरणार आहेत. कल्याण-मुरबाड रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी जवळपास ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाची निविदा भूसंपादनाच्या प्रक्रियेनंतर काढली जाणार आहे. कल्याण ते टोकावडेपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्यात असलेल्या नदीवरील पुलांचेही चौपदीकरण करून ते नव्याने विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे कल्याण-माळशेज मार्गावरील कोंडी दूर होईल. हा रस्ता टोल फ्री असेल. एमएमआरडीएतर्फे शिरसाट फाटा ते उरण रस्ता दुपदरी केला जाणार आहे. हा रस्ता खडवली, गोविली, बदलापूरमार्गे उरणला जोडला जाईल. या रस्त्यावरील भातसा नदीवर खडवली येथील पूल, काळू नदीवरील टिटवाळा येथील पूल आणि उल्हास नदीवरील आपटी येथील पूलही रुंद केले जातील. वडदोरा ते उरणदरम्यान जवळपास ७०० कोटी खर्चून नव्याने सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा रस्ता मानिवली, गोवेली, रायते, आणे, भिसोळ, घोटसई या मार्गे उरणला जोडला जाईल. परंतु, वांगणीनजीक सह्याद्रीच्या फूटहिल्स असलेल्या डोंगराला बोगदा पाडून हा रस्ता उरणकडे मार्गस्त होईल. या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येईल. मुंबई-नागपूरदरम्यान नवीन सहा पदरी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. सरकारचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. चिंचवली येथे या रस्त्याचे आउटलेट आहे. याच रस्त्यावर एक हजार एकर जमीन संपादित करून तेथे नवी औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यास सुनियोजित शहराचा दर्जा दिला जाणार आहे. हा विकास सिडकोच्या धर्तीवर केला जाईल. त्यामुळे फळेगाव उतणे, नडगाव, दानगाव, चिंचवली, राया, उशीद या गावांचा परिसराचा कायापालट होणार आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाईल.शहापूर ते कर्जत चौपदरी रस्त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. हा रस्ता टोलफ्री असेल. या रस्त्यामुळे नाशिक मार्गावरील वाहतूक पुणेमार्गे वळवली जाईल. शहापूर व मुरबाडमधील प्रवासी व मालवाहतूकदारांना कल्याणला वळसा घालावा लागणार नाही.