शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कल्याण तालुक्यात पाच सक्षम रस्त्यांचे जाळे

By admin | Updated: September 8, 2016 02:25 IST

मुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा

मुरलीधर भवार, कल्याणमुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाणार आहे. रस्ते विकास व सुनियोजित शहर विकास प्रकल्पामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात टिटवाळा, गोवेली, खडवली ही ठिकाणे विकासाचे केंद्रविंदू ठरणार आहेत. कल्याण-मुरबाड रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी जवळपास ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाची निविदा भूसंपादनाच्या प्रक्रियेनंतर काढली जाणार आहे. कल्याण ते टोकावडेपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्यात असलेल्या नदीवरील पुलांचेही चौपदीकरण करून ते नव्याने विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे कल्याण-माळशेज मार्गावरील कोंडी दूर होईल. हा रस्ता टोल फ्री असेल. एमएमआरडीएतर्फे शिरसाट फाटा ते उरण रस्ता दुपदरी केला जाणार आहे. हा रस्ता खडवली, गोविली, बदलापूरमार्गे उरणला जोडला जाईल. या रस्त्यावरील भातसा नदीवर खडवली येथील पूल, काळू नदीवरील टिटवाळा येथील पूल आणि उल्हास नदीवरील आपटी येथील पूलही रुंद केले जातील. वडदोरा ते उरणदरम्यान जवळपास ७०० कोटी खर्चून नव्याने सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा रस्ता मानिवली, गोवेली, रायते, आणे, भिसोळ, घोटसई या मार्गे उरणला जोडला जाईल. परंतु, वांगणीनजीक सह्याद्रीच्या फूटहिल्स असलेल्या डोंगराला बोगदा पाडून हा रस्ता उरणकडे मार्गस्त होईल. या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येईल. मुंबई-नागपूरदरम्यान नवीन सहा पदरी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. सरकारचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. चिंचवली येथे या रस्त्याचे आउटलेट आहे. याच रस्त्यावर एक हजार एकर जमीन संपादित करून तेथे नवी औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यास सुनियोजित शहराचा दर्जा दिला जाणार आहे. हा विकास सिडकोच्या धर्तीवर केला जाईल. त्यामुळे फळेगाव उतणे, नडगाव, दानगाव, चिंचवली, राया, उशीद या गावांचा परिसराचा कायापालट होणार आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाईल.शहापूर ते कर्जत चौपदरी रस्त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. हा रस्ता टोलफ्री असेल. या रस्त्यामुळे नाशिक मार्गावरील वाहतूक पुणेमार्गे वळवली जाईल. शहापूर व मुरबाडमधील प्रवासी व मालवाहतूकदारांना कल्याणला वळसा घालावा लागणार नाही.