शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

मेरीटाईमच्या निर्णयाने मच्छिमारांची घरे झाली उध्वस्त

By admin | Updated: June 26, 2017 01:23 IST

राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील पाच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मान्यता रद्द केल्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून समुद्रात निर्माण झालेल्या महाकाय लाटाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील पाच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मान्यता रद्द केल्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून समुद्रात निर्माण झालेल्या महाकाय लाटाच्या तडाख्याने किनाऱ्यावरील अनेक घरामध्ये पाणी शिरले. शनिवारी दुपारी वर्षभरातील मोठी भरती येवून ५ मिटर्स उंचीच्या लाटा उसळणार असल्याने आपली घरे वाचविण्यासाठी सर्व कुटुंबे मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटात मातीच्या गोणीचा बंधारा बांधून आपले संसार वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.पालघर जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, एडवण, तारापूर आणि घिवली अशा पाच मच्छिमार गावाच्या किनाऱ्यावर होणारी धूप आणि त्यांच्या घरांना निर्माण झालेला धोका लक्षात घेता पतन विभागा कडून वरील गावात धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचे प्रस्ताव विचाराधीन होते. हवामान खात्याने २३ जून ते २२ सप्टेंबर दरम्यान १८ दिवस धोक्याचे असल्याची माहिती दिली असून सुमारे पाच मीटर्सच्या लाटा उसळणार असल्याचे सांगितले असल्याने या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या उभारणीची कामे लवकरच हाती घेण्याचा मानस पतन विभागाचा होता. मात्र राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने हे पाचही बंधारे बांधण्याच्या प्रस्तावाला ना हरकत पत्र देण्यास नकार दिल्याने या बंधाऱ्याचे काम रखडले आहे.त्यामुळे २३ जून पासून समुद्रात निर्माण झालेल्या तुफानी वादळी लाटांचे तडाखे किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायतींना बसायला सुरुवात झाली होती. आज दुपारी १२ वाजल्यापासून उधाणाला सुरुवात होणार असल्याने पहाटे ५ वाजल्या पासून किनारपट्टीवरील अनेक घरातील कुटुंबे आपल्या कच्च्या बच्या सह आपली घरे वाचविण्यासाठी मातीच्या गोणी भरून त्या गोणी आपल्या घरापुढे रचण्याचे काम करीत होते. पतन विभागा कडून सातपाटीतील बंधाऱ्याला पडलेली भगदाडे बुजविण्याची कामे मागील काही दिवसापासून सुरू असली तरी आज समुद्राच्या लाटांनी बंधारा ओलांडून मच्छीमारांच्या घरांना तडाखा दिला. सातपाटीमधील क्रांती मंडळ,दांडा पाडा ई. भागातील काही घरात समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे सेनेचे मंत्री रामदास कदम ह्यांच्या अखत्यारीत असलेल्या पर्यावरण विभागा कडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नाहरकत दाखले मिळवून घेणे गरजेचे आहे.