शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मेरीटाईमच्या निर्णयाने मच्छिमारांची घरे झाली उध्वस्त

By admin | Updated: June 26, 2017 01:23 IST

राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील पाच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मान्यता रद्द केल्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून समुद्रात निर्माण झालेल्या महाकाय लाटाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील पाच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मान्यता रद्द केल्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून समुद्रात निर्माण झालेल्या महाकाय लाटाच्या तडाख्याने किनाऱ्यावरील अनेक घरामध्ये पाणी शिरले. शनिवारी दुपारी वर्षभरातील मोठी भरती येवून ५ मिटर्स उंचीच्या लाटा उसळणार असल्याने आपली घरे वाचविण्यासाठी सर्व कुटुंबे मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटात मातीच्या गोणीचा बंधारा बांधून आपले संसार वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.पालघर जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, एडवण, तारापूर आणि घिवली अशा पाच मच्छिमार गावाच्या किनाऱ्यावर होणारी धूप आणि त्यांच्या घरांना निर्माण झालेला धोका लक्षात घेता पतन विभागा कडून वरील गावात धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचे प्रस्ताव विचाराधीन होते. हवामान खात्याने २३ जून ते २२ सप्टेंबर दरम्यान १८ दिवस धोक्याचे असल्याची माहिती दिली असून सुमारे पाच मीटर्सच्या लाटा उसळणार असल्याचे सांगितले असल्याने या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या उभारणीची कामे लवकरच हाती घेण्याचा मानस पतन विभागाचा होता. मात्र राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने हे पाचही बंधारे बांधण्याच्या प्रस्तावाला ना हरकत पत्र देण्यास नकार दिल्याने या बंधाऱ्याचे काम रखडले आहे.त्यामुळे २३ जून पासून समुद्रात निर्माण झालेल्या तुफानी वादळी लाटांचे तडाखे किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायतींना बसायला सुरुवात झाली होती. आज दुपारी १२ वाजल्यापासून उधाणाला सुरुवात होणार असल्याने पहाटे ५ वाजल्या पासून किनारपट्टीवरील अनेक घरातील कुटुंबे आपल्या कच्च्या बच्या सह आपली घरे वाचविण्यासाठी मातीच्या गोणी भरून त्या गोणी आपल्या घरापुढे रचण्याचे काम करीत होते. पतन विभागा कडून सातपाटीतील बंधाऱ्याला पडलेली भगदाडे बुजविण्याची कामे मागील काही दिवसापासून सुरू असली तरी आज समुद्राच्या लाटांनी बंधारा ओलांडून मच्छीमारांच्या घरांना तडाखा दिला. सातपाटीमधील क्रांती मंडळ,दांडा पाडा ई. भागातील काही घरात समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे सेनेचे मंत्री रामदास कदम ह्यांच्या अखत्यारीत असलेल्या पर्यावरण विभागा कडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नाहरकत दाखले मिळवून घेणे गरजेचे आहे.