शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मेरीटाईमच्या निर्णयाने मच्छिमारांची घरे झाली उध्वस्त

By admin | Updated: June 26, 2017 01:23 IST

राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील पाच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मान्यता रद्द केल्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून समुद्रात निर्माण झालेल्या महाकाय लाटाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील पाच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मान्यता रद्द केल्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून समुद्रात निर्माण झालेल्या महाकाय लाटाच्या तडाख्याने किनाऱ्यावरील अनेक घरामध्ये पाणी शिरले. शनिवारी दुपारी वर्षभरातील मोठी भरती येवून ५ मिटर्स उंचीच्या लाटा उसळणार असल्याने आपली घरे वाचविण्यासाठी सर्व कुटुंबे मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटात मातीच्या गोणीचा बंधारा बांधून आपले संसार वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.पालघर जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, एडवण, तारापूर आणि घिवली अशा पाच मच्छिमार गावाच्या किनाऱ्यावर होणारी धूप आणि त्यांच्या घरांना निर्माण झालेला धोका लक्षात घेता पतन विभागा कडून वरील गावात धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचे प्रस्ताव विचाराधीन होते. हवामान खात्याने २३ जून ते २२ सप्टेंबर दरम्यान १८ दिवस धोक्याचे असल्याची माहिती दिली असून सुमारे पाच मीटर्सच्या लाटा उसळणार असल्याचे सांगितले असल्याने या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या उभारणीची कामे लवकरच हाती घेण्याचा मानस पतन विभागाचा होता. मात्र राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने हे पाचही बंधारे बांधण्याच्या प्रस्तावाला ना हरकत पत्र देण्यास नकार दिल्याने या बंधाऱ्याचे काम रखडले आहे.त्यामुळे २३ जून पासून समुद्रात निर्माण झालेल्या तुफानी वादळी लाटांचे तडाखे किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायतींना बसायला सुरुवात झाली होती. आज दुपारी १२ वाजल्यापासून उधाणाला सुरुवात होणार असल्याने पहाटे ५ वाजल्या पासून किनारपट्टीवरील अनेक घरातील कुटुंबे आपल्या कच्च्या बच्या सह आपली घरे वाचविण्यासाठी मातीच्या गोणी भरून त्या गोणी आपल्या घरापुढे रचण्याचे काम करीत होते. पतन विभागा कडून सातपाटीतील बंधाऱ्याला पडलेली भगदाडे बुजविण्याची कामे मागील काही दिवसापासून सुरू असली तरी आज समुद्राच्या लाटांनी बंधारा ओलांडून मच्छीमारांच्या घरांना तडाखा दिला. सातपाटीमधील क्रांती मंडळ,दांडा पाडा ई. भागातील काही घरात समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे सेनेचे मंत्री रामदास कदम ह्यांच्या अखत्यारीत असलेल्या पर्यावरण विभागा कडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नाहरकत दाखले मिळवून घेणे गरजेचे आहे.