शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भाईंदरमध्ये वीज कोसळून मच्छीमाराचा मृत्यू, ६ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 15:43 IST

यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील पातान बंदर समुद्र किनारी प्रातःविधी साठी गेलेल्या मच्छीमारांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ६ जण किरकोळ जखमी झाले. यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता. स्टॅनी इनास अदमनी ( ६६ ) असे निधन झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन - पाली - चौक परिसरातील बहुतांश मच्छीमार समुद्र किनारी प्रातः विधीसाठी जातात . पातान बंदर येथे राहणारे स्टॅनी देखील घराच्या मागील समुद्र किनारी सवयी प्रमाणे सकाळी साडे सहाच्या सुमारास प्रातःविधीसाठी गेले होते . त्यावेळी अन्य मच्छीमार देखील प्रातःविधी आदी साठी आले होते . 

वादळ - विजेचा कडकडाट सुरु असतानाच अचानक प्रचंड आवाज होऊन वीज कोसळली .  स्टॅनी यांच्या वर वीज पडल्याने ते जागीच मरण पावले . तर त्या ठिकाणी असलेले रोहन राजेश पोशापीर , गिल्डर खोपटकर , राजेश पिला, सनी पिला आदी जखमी झाले .वीज पडताच सर्वांचा जिवाच्या भीतीने थरकाप उडाला . परंतु पावसाची रिमझिम व किनारा ओला असल्याने  काहींना विजेचे झटके बसले . आवाज तर इतका मोठा होता कि कानठळ्या बसल्या . तासभर तर काहींचे कान सुन्न झाले होते . 

जखमींना जमेल तसे लगतच्या डॉक्टारां कडे उपचारासाठी नेण्यात आले . मच्छीमार नेते बर्नाड डिमेलो यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती देत आवश्यक मदतकार्य सुरु केले . तहसीलदार अधिक पाटील यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनेचा आढावा घेऊन शासना कडून  शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले . उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार साळुंके यांनी घटना स्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . 

वीज कोसळल्याने येथील काही घरां मधील विजेची उपकरणं बंद पडली . तर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता .  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  उत्तन परिसरातील मच्छीमारांनी समुद्र किनारी उघड्यावर प्रातःविधी साठी जाऊ नये असे आवाहन महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांनी केले आहे .