शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भाईंदरमध्ये वीज कोसळून मच्छीमाराचा मृत्यू, ६ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 15:43 IST

यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील पातान बंदर समुद्र किनारी प्रातःविधी साठी गेलेल्या मच्छीमारांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ६ जण किरकोळ जखमी झाले. यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता. स्टॅनी इनास अदमनी ( ६६ ) असे निधन झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन - पाली - चौक परिसरातील बहुतांश मच्छीमार समुद्र किनारी प्रातः विधीसाठी जातात . पातान बंदर येथे राहणारे स्टॅनी देखील घराच्या मागील समुद्र किनारी सवयी प्रमाणे सकाळी साडे सहाच्या सुमारास प्रातःविधीसाठी गेले होते . त्यावेळी अन्य मच्छीमार देखील प्रातःविधी आदी साठी आले होते . 

वादळ - विजेचा कडकडाट सुरु असतानाच अचानक प्रचंड आवाज होऊन वीज कोसळली .  स्टॅनी यांच्या वर वीज पडल्याने ते जागीच मरण पावले . तर त्या ठिकाणी असलेले रोहन राजेश पोशापीर , गिल्डर खोपटकर , राजेश पिला, सनी पिला आदी जखमी झाले .वीज पडताच सर्वांचा जिवाच्या भीतीने थरकाप उडाला . परंतु पावसाची रिमझिम व किनारा ओला असल्याने  काहींना विजेचे झटके बसले . आवाज तर इतका मोठा होता कि कानठळ्या बसल्या . तासभर तर काहींचे कान सुन्न झाले होते . 

जखमींना जमेल तसे लगतच्या डॉक्टारां कडे उपचारासाठी नेण्यात आले . मच्छीमार नेते बर्नाड डिमेलो यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती देत आवश्यक मदतकार्य सुरु केले . तहसीलदार अधिक पाटील यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनेचा आढावा घेऊन शासना कडून  शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले . उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार साळुंके यांनी घटना स्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . 

वीज कोसळल्याने येथील काही घरां मधील विजेची उपकरणं बंद पडली . तर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता .  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  उत्तन परिसरातील मच्छीमारांनी समुद्र किनारी उघड्यावर प्रातःविधी साठी जाऊ नये असे आवाहन महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांनी केले आहे .