शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आधी मीरा-भाईंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायीचा वाटा मागा, शिवसेनेचा भाजपला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:23 IST

स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे.

- अजित मांडके ठाणे : स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर स्थायी समिती किमान एक वर्षासाठी मिळेल, अशी आशा भाजपला होती. परंतु, आधी मीरा-भार्इंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायी समितीचा वाटा मागा, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिल्याची माहिती समोर आली आहे. मीरा-भार्इंदरमुळेच ठाण्यात शिवसेनेने भाजपची साथ न घेता त्यांना स्थायीपासून दूर ठेवल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे.स्थायी समिती सदस्यांची निवड काही दिवसांपापूर्वी करण्यात आली आहे. परंतु, या सदस्यनिवडीवरून राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने सदस्यांची निवड करून स्थायी समिती गठितच न करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करून स्थायी समितीत येणारे विषय थेट महासभेत नेऊन मंजुरीचा घाट घातला जात असल्याचेही राष्टÑवादीचे म्हणणे आहे.दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेने स्थायीपासून केवळ राष्टÑवादीलाच नाही, तर भाजपलासुद्धा दूर ठेवल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या वादावर दोन्ही पक्षांतील वरिष्ठांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पडदा पडला होता. परंतु, यावेळेस भाजपने स्थायी समितीत वाटा हवा असल्याचा हट्ट धरला आहे. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ आल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले होते.>भाजपला जर ठाण्यात स्थायी समितीमध्ये वाटा हवा असेल, तर आधी भाजपने मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे शिवसेनेला वाटा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ठाण्यात वाटा कसा मिळवायचा, असा पेच भाजपपुढे आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली, तरी स्थानिक पातळीवर युतीत तेढ असल्याचेच चित्र यानिमित्ताने दिसून येत आहे.