शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

आधी मीरा-भाईंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायीचा वाटा मागा, शिवसेनेचा भाजपला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:23 IST

स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे.

- अजित मांडके ठाणे : स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर स्थायी समिती किमान एक वर्षासाठी मिळेल, अशी आशा भाजपला होती. परंतु, आधी मीरा-भार्इंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायी समितीचा वाटा मागा, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिल्याची माहिती समोर आली आहे. मीरा-भार्इंदरमुळेच ठाण्यात शिवसेनेने भाजपची साथ न घेता त्यांना स्थायीपासून दूर ठेवल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे.स्थायी समिती सदस्यांची निवड काही दिवसांपापूर्वी करण्यात आली आहे. परंतु, या सदस्यनिवडीवरून राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने सदस्यांची निवड करून स्थायी समिती गठितच न करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करून स्थायी समितीत येणारे विषय थेट महासभेत नेऊन मंजुरीचा घाट घातला जात असल्याचेही राष्टÑवादीचे म्हणणे आहे.दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेने स्थायीपासून केवळ राष्टÑवादीलाच नाही, तर भाजपलासुद्धा दूर ठेवल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या वादावर दोन्ही पक्षांतील वरिष्ठांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पडदा पडला होता. परंतु, यावेळेस भाजपने स्थायी समितीत वाटा हवा असल्याचा हट्ट धरला आहे. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ आल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले होते.>भाजपला जर ठाण्यात स्थायी समितीमध्ये वाटा हवा असेल, तर आधी भाजपने मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे शिवसेनेला वाटा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ठाण्यात वाटा कसा मिळवायचा, असा पेच भाजपपुढे आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली, तरी स्थानिक पातळीवर युतीत तेढ असल्याचेच चित्र यानिमित्ताने दिसून येत आहे.