शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पहिले आंतरराष्ट्रीय तटस्थ क्रिकेट पंच पिलू रिपोर्टर यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 3, 2023 16:18 IST

रिपोर्टर हे जन्मापासून ठाण्यात वास्तव्यास होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषा त्यांना अवगत होत्या.

ठाणे : पहिले आंतरराष्ट्रीय तटस्थ क्रिकेट पंच आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अम्पायर राहिलेले भारताचे एकमेव पंच पिलू दादा रिपोर्टर यांचे रविवारी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी होमाय आणि दोन कन्या असा परिवार आहे. १९८६ -८७ साली पाकिस्तानमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान मालिकेत पिल्लू रिपोर्टर बीके रामस्वामी या पंचांनी क्रिकेट इतिहास प्रथमच नेमले गेलेले तटस्थ पंच म्हणून काम पाहिले. 

रिपोर्टर हे जन्मापासून ठाण्यात वास्तव्यास होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषा त्यांना अवगत होत्या. ठाणे येथील टेंभीनाक्याजवळ रिपोर्टर हे वास्तव्यास होते. १९८४ साली डेव्हिड गोव्हर हे इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर आले असता त्या दौऱ्यात पिल्लू रिपोर्टर व एम वाय गुप्ते या ठाण्याच्या पंचांनी कसोटी पंच म्हणून पदार्पण केले. १९८४ ते १९९३ दरम्यान रिपोर्टर यांनी एकूण १४ कसोटी तर १९८४ ते १९९४ दरम्यान त्यांनी २२ एकदिवसीय सामन्यात तसेच, १३ प्रथम दर्जाच्या सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. निवृत्तीनंतर मार्गदर्शन करताना ते या चारही भाषांचा माध्यम म्हणून उपयोग करत. ठाण्याच्या मुलांसाठी रिपोर्टर यांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात प्रथमच अभ्यास वर्गाचे आयोजन केले. डॉ. प्रकाश वझे, शानबाग व विजय प्रधान ही या अभ्यास वर्गातील त्रिमूर्ती सुवर्णपदकाचे मानकर ठरले.

टॅग्स :thaneठाणे