शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाण्याची कश्मिरा राज्यात प्रथम; महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यूपीएससीत यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 06:08 IST

महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यशस्वी झाले. यशवंतामध्ये राज्याचा १२ टक्के वाटा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : यूपीएससी परीक्षेत ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम आणि देशात २५ वा क्रमांक मिळवत ठाण्याच्या  शिरपेचात मानाचा तुरा राेवला. मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे मत कश्मिरा यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यशस्वी झाले. यशवंतामध्ये राज्याचा १२ टक्के वाटा आहे. कश्मिरा या डेन्टिस्ट असून व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश संपादन केले. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे त्यांनी यावेळी यशस्वी गरुडभरारी घेतली. माझे पहिले प्राधान्य आयएएस अधिकारी होण्याला आहे.  भारतात कोणत्याही ठिकाणी समर्पण भावनेने काम करेन, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी सद्गुरू वामनराव पै यांची प्रवचने ऐकली आहेत. बालसंस्कार केंद्रात जायचे तेथूनदेखील मला प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले.  

यशस्विनी ‘चारचाैघी’ 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२च्या निकालात दिल्ली विद्यापीठाची पदवीधर ईशिता किशोरने प्रथम क्रमांक पटकावला. पहिल्या चारही क्रमांकांवर मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया, उमा हरथी एन आणि स्मृती मिश्रा यांनी परीक्षेत अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावला. गरिमा लोहिया आणि स्मृती मिश्रा याही दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर आहेत, तर उमा हरथी एन. आयआयटी, हैदराबाद येथील बी.टेक. पदवीधारक आहे. या प्रतिष्ठेच्या परीक्षेत महिला उमेदवारांनी पहिले तीन क्रमांक पटकावण्याचे हे सलग दुसरे वर्षे आहे.  

स्वप्न सत्यात उतरले nनागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. nआयएएस झाल्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी काम करेन, असे म्हणणाऱ्या यूपीएससी परीक्षेत प्रथम आलेल्या २६ वर्षीय ईशिता किशोरने तिसऱ्या प्रयत्नात प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण केली. nकठीण काळात प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबीयांबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. 

वृत्तपत्र वाचनाचा फायदा झाला  -  डॉ. कश्मिरा संखे यूपीएससीच्या परीक्षेकरिता १४ ते १५ तास अभ्यास केला. १५ मिनिटे अभ्यास आणि १० मिनिटे ब्रेक हा पॅटर्न अंमलात आणला होता. एका विषयासाठी मी क्लास लावला होता. बाकी इतर विषयांसाठी मी स्वयंअध्ययन केले. मला वाचनाची आवड आहे. वृत्तपत्र मी सातत्याने वाचत होते. वाचनाचा फायदा मला परीक्षेत झाला.  डॉक्टर बनण्याच्या आधीपासून मला सनदी सेवेत येण्याची इच्छा होती. डॉक्टर झाल्यावर रुग्णांच्या संपर्कात यायचे. त्यावेळी त्यांच्या खूप समस्या असल्याचे जाणवले. आपण आयएएस झाल्यावर त्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतो, असे वाटायला लागले. याच इच्छाशक्तीने मी सनदी सेवेत येण्याचा ध्यास घेतला. आपल्या कुटुंबात कोणीही आयएएस नाही. मला माझ्या मित्रमैत्रिणींचा या प्रवासात खूप पाठिंबा लाभला. सगळ्यांनी केलेले सहकार्य आणि पाठिंब्याशिवाय हे यश मिळणे शक्य झाले नसते. अभ्यास आणि काम यांचा योग्य ताळमेळ मी घालू शकले. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग