शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

आधी घरांचा निर्णय, मगच पुलाची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

ठाणे : ऐरोली- कळवा एलिव्हेटेड पुलाच्या निर्माणामध्ये बाधित होणाऱ्या ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवरील मुख्य मार्गिकेतील भोलानगर परिसरात सध्या ...

ठाणे : ऐरोली- कळवा एलिव्हेटेड पुलाच्या निर्माणामध्ये बाधित होणाऱ्या ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवरील मुख्य मार्गिकेतील भोलानगर परिसरात सध्या एमआरव्हीसीकडून घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मूळ सर्व्हे ९५० घरांपैकी केवळ बाधित होणाऱ्या ४५० घरांचा ताबा घेण्यात येणार असून, उर्वरित घरांना रेल्वेच्या तीन ट्रॅकवर (पटरी) राहावे लागणार असल्याने स्थानिकांनी या सर्व्हेला विरोध केला आहे. याबाबत त्यांनी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे धाव घेतली होती.

त्यानुसार रविवारी आव्हाड यांनी भोलानगर येथील बाधित होणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन जोपर्यंत घरांची पुनवर्सन प्रक्रिया होणार नाही, तोपर्यंत कोणत्याही घराला हात लावू देणार नाही, असा इशारा एमआरव्हीसी आणि एमएमआरडीएला दिला. वेळप्रसंगी नागरिकांच्या घरांसाठी आपण मंत्रीपद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एलिव्हेटेड पुलाची उभारणी करत असताना बाधित होणाऱ्या मुख्य मार्गिकेतील भोलानगर हा परिसरात येतो. या परिसराचा एमआरव्हीसीने स्पार्क संस्थेच्या माध्यमातून घरांच्या सर्व्हेचे काम सध्या सुरू केले आहे. या आधी झालेल्या दोन सर्व्हेनंतर तिसरा सर्व्हे झालेल्या घरांचे एमएमआरडीए आणि एमआरव्हीसी या घरांचे क्षेत्र अधिग्रहित करून एलिव्हेटेड पुलांच्या कामाला सुरुवात करणार आहे; परंतु येथील स्थानिक नागरिकांनी हा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करून तीन रेल्वे ट्रॅकमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सरसकट पुनर्वसन करण्याची मागणी करून घरांचा सर्व्हे बंद पाडला आहे. यानंतर आव्हाड यांनी एमआरव्हीसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून जोपर्यंत बाधित होणाऱ्या नागरिकांना घरे कुठे देणार? किती फुटांचे देणार? याबाबत लेखी आश्वासान दिले जात नाही. तोपर्यंत सर्व्हे आणि पुनवर्सन प्रक्रिया सुरू करू नये, असे सक्त आदेश दिले.

आजपर्यंत या ठिकाणी एलिव्हेटेड मार्गाचे तीन सर्व्हे झाले आहेत; परंतु ते करीत असताना एमआयव्हीसीने नेमलेल्या स्पार्क संस्थेचा गलथान कारभार पुढे आला आहे. सध्याचा तिसरा सर्व्हे रद्द करून परिसरातील मोकळ्या जागेवर न्यू शिवाजीनगरमार्गे कळवा रेल्वेस्थानकाकडे जाण्याच्या मार्गावर ब्रीज जाईल, असा चौथा सर्व्हे करून न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या बैठकीला स्थानिक नगरसेविका पूजा करसुळे, किशोर आंग्रे, माजी नगसेवक अक्षय ठाकूर, त्याचप्रमाणे भोलानगर रहिवासी गृहनिर्माण एकता संघ (नियो)चे प्रमुख ज्ञानेश्वर जाधव व ज्ञानेश्वर राजपंके, अंत्राम वाघमारे, कुणाल सूर्यवंशी, परेश रुकाडे, संभाजी मोरे, बळीराम बोंडेकर, सुरेश झेंडे नागरिक उपस्थित होते.

रेंटल सोसायटीमध्ये जाण्यास विरोध

भोलानगर येथील नागरिकांची घरे १९७० पासूनची आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा उद्योग व्यवसाय याच परिसरात आहे. एकीकडे कळवा आणि प्रस्तावित दिघा रेल्वेस्टेशनजवळ असताना आम्ही इतरत्र राहायला का जायचे? असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेंटल हाउसिंग सोसायटीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याला स्थानिकांनी विरोध करून नजीकच्या ठिकाणीच पुनवर्सनाची मागणी लावून धरली आहे.