शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

ठाणे जिल्ह्यात अवैध रेती उपशाविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत पहिली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:17 IST

ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे.

ठाणे दि ८ - ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्याने भविष्यात या कारवायांना वेसन बसेल, अशी आशा आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या बाबतीत अधिक कठोर कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत चर्चा केली होती.

शिवाजी प्रेरणा सोसायटी, कोपरगाव, डोंबिवली पश्चिम येथे राहणारा हनुमान राजाराम म्हात्रे ही 51 वर्षीय व्यक्ती या कायद्यात स्थानबद्ध करण्यात आली असून, त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. धोकादायक व्यक्ती या शीर्षकाखाली पोलिस सातत्याने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करतात. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्ट‌िव्ह‌िटीज्-झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यानुसार ही कारवाई केली जाते. वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळ्यांना काबूत ठेवण्यासाठी पोलिसांना विशेष कायद्यांचा वापर करता येतो. या कायद्याच्या मदतीने पोलीस गुन्हेगारांच्या हालचाली नियंत्र‌ित करू शकतात. शारीरिक इजा आणि मालमत्तेच्या गुन्ह्यांसंदर्भात ही कारवाई होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवर एमपीडीएनुसार कारवाई झाली तर कोणत्याही सुनावणीविना त्यास एका वर्षासाठी जेलमध्ये बंद करता येते.

अवैध गौण खनिजांच्या संदर्भात उत्खनन व वाहतूक याविरुद्ध कल्याण, मोठा गाव, डोंबिवली खाडीमधून तसेच रेतीबंदर भागात गेल्या २ ते ३ वर्षांत ७२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे कल्याण तहसीलदार यांनी कल्याण पोलीस उपयुक्त परिमंडळ ३ यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यापैकी २४ गुन्हे अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई व्हावी असा आग्रह प्रशासनाने धरला आहे.