शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात अवैध रेती उपशाविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत पहिली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:17 IST

ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे.

ठाणे दि ८ - ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्याने भविष्यात या कारवायांना वेसन बसेल, अशी आशा आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या बाबतीत अधिक कठोर कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत चर्चा केली होती.

शिवाजी प्रेरणा सोसायटी, कोपरगाव, डोंबिवली पश्चिम येथे राहणारा हनुमान राजाराम म्हात्रे ही 51 वर्षीय व्यक्ती या कायद्यात स्थानबद्ध करण्यात आली असून, त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. धोकादायक व्यक्ती या शीर्षकाखाली पोलिस सातत्याने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करतात. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्ट‌िव्ह‌िटीज्-झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यानुसार ही कारवाई केली जाते. वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळ्यांना काबूत ठेवण्यासाठी पोलिसांना विशेष कायद्यांचा वापर करता येतो. या कायद्याच्या मदतीने पोलीस गुन्हेगारांच्या हालचाली नियंत्र‌ित करू शकतात. शारीरिक इजा आणि मालमत्तेच्या गुन्ह्यांसंदर्भात ही कारवाई होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवर एमपीडीएनुसार कारवाई झाली तर कोणत्याही सुनावणीविना त्यास एका वर्षासाठी जेलमध्ये बंद करता येते.

अवैध गौण खनिजांच्या संदर्भात उत्खनन व वाहतूक याविरुद्ध कल्याण, मोठा गाव, डोंबिवली खाडीमधून तसेच रेतीबंदर भागात गेल्या २ ते ३ वर्षांत ७२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे कल्याण तहसीलदार यांनी कल्याण पोलीस उपयुक्त परिमंडळ ३ यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यापैकी २४ गुन्हे अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई व्हावी असा आग्रह प्रशासनाने धरला आहे.